शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:25 IST

सोलापूरचे सर्वच ३१ कारखाने बंद; गाळपात कोल्हापूर दुसºया तर अहमदनगर तिसºया क्रमांकावर

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार

सोलापूर : ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावरच असून दुसºया क्रमांकावर कोल्हापूर तर तिसºया क्रमांकावर अहमदनगर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील हंगाम सुरू केलेले सर्वच ३१ कारखाने बंद झाले असले तरी कोल्हापूर व अहमदनगरचे काही कारखाने अद्यापही सुरू आहेत.

राज्यातील साखर हंगाम यावर्षी एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यावर्षी सर्वाधिक सहकारी व खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले साखर कारखाने पाच फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत राज्यातील १२० हून अधिक साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ३१ कारखान्यांचा पट्टा पडला असून, जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ५९ लाख ९५ हजार ७४२ मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादन एक कोटी ६३ लाख ६६ हजार ६५३ क्विंटल इतके झाले असून साखर उतारा १०.२३ इतका पडला आहे. 

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यापूर्वी अधिकाधिक ३० पर्यंतच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. 

सोलापूर जिल्ह्यानंतर कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्याचे गाळप आहे, कोल्हापूरच्या २२ कारखान्यांनी एक कोटी २९ लाख ७० हजार मे.टन. तर अहमदनगर जिल्ह्याचे एक कोटी २७ लाख ६५ हजार मे. टन. गाळप झाले आहे, कोल्हापूरच्या पाच तर अहमदनगरच्या १५ साखर कारखान्यांचे गाळप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यापैकी दुसºया क्रमांकावर कोण?,हे संपूर्ण कारखाने बंद झाल्यानंतरच समजणार आहे; मात्र सोलापूर जिल्ह्यापेक्षा अन्य कोणताही जिल्हा गाळप करु शकणार नाही कारण राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा हंगाम अखेरला आला आहे.

विठ्ठलराव शिंदे राज्यात पहिला

  • - यावर्षी हंगाम सुरू केलेल्या राज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी म्हणजे १७ लाख ४४ हजार १४९ मे. टन इतके झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर कारखान्याचे गाळप १६ लाख ८९ हजार ६०० मे. टन इतके झाले असून हा कारखाना सुरू आहे. त्यामुळे आज तरी विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात राज्यात प्रथम आहे.
  • च्राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ११.१५ टक्के इतका मिळाला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र