शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

राज्यातील ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:25 IST

सोलापूरचे सर्वच ३१ कारखाने बंद; गाळपात कोल्हापूर दुसºया तर अहमदनगर तिसºया क्रमांकावर

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार

सोलापूर : ऊस गाळपात यंदाही सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावरच असून दुसºया क्रमांकावर कोल्हापूर तर तिसºया क्रमांकावर अहमदनगर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील हंगाम सुरू केलेले सर्वच ३१ कारखाने बंद झाले असले तरी कोल्हापूर व अहमदनगरचे काही कारखाने अद्यापही सुरू आहेत.

राज्यातील साखर हंगाम यावर्षी एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यावर्षी सर्वाधिक सहकारी व खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले साखर कारखाने पाच फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत राज्यातील १२० हून अधिक साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ३१ कारखान्यांचा पट्टा पडला असून, जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ५९ लाख ९५ हजार ७४२ मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादन एक कोटी ६३ लाख ६६ हजार ६५३ क्विंटल इतके झाले असून साखर उतारा १०.२३ इतका पडला आहे. 

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यापूर्वी अधिकाधिक ३० पर्यंतच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. 

सोलापूर जिल्ह्यानंतर कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्याचे गाळप आहे, कोल्हापूरच्या २२ कारखान्यांनी एक कोटी २९ लाख ७० हजार मे.टन. तर अहमदनगर जिल्ह्याचे एक कोटी २७ लाख ६५ हजार मे. टन. गाळप झाले आहे, कोल्हापूरच्या पाच तर अहमदनगरच्या १५ साखर कारखान्यांचे गाळप अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यापैकी दुसºया क्रमांकावर कोण?,हे संपूर्ण कारखाने बंद झाल्यानंतरच समजणार आहे; मात्र सोलापूर जिल्ह्यापेक्षा अन्य कोणताही जिल्हा गाळप करु शकणार नाही कारण राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा हंगाम अखेरला आला आहे.

विठ्ठलराव शिंदे राज्यात पहिला

  • - यावर्षी हंगाम सुरू केलेल्या राज्यातील १९५ साखर कारखान्यांपैकी माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप उच्चांकी म्हणजे १७ लाख ४४ हजार १४९ मे. टन इतके झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर कारखान्याचे गाळप १६ लाख ८९ हजार ६०० मे. टन इतके झाले असून हा कारखाना सुरू आहे. त्यामुळे आज तरी विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात राज्यात प्रथम आहे.
  • च्राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे एकूण ९१७.०३  लाख मे.टन गाळप झाले असून एक हजार २५ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा ११.१५ टक्के इतका मिळाला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र