शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Solapur: कॉँग्रेस सत्तेत आल्यास ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:32 IST

Solapur News: देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

- नारायण गावस पणजी - देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत गोवा प्रदेश कॉँग्रेसचे विरेंद्र शिरोडकर व इतर सदस्य उपस्थित होते.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांची गेली १० वर्षे फसवणूक केली म्हणून देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता कॉँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर किसान न्याय गॅरंटी मार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या जाणार. ऋणमुक्त आयोग लागू करुन शेतकऱ्यांचा सर्व कर्ज माफ केला जाणार आहे. शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत पिकावरील विमा दिला जाणार आहे. याेग्य प्रकारे आयात निर्यात पॉलिसी लागू करणार. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव दिला जाणार आहे. तसेच कृषी वापरावरील साहित्याची जीएसटी रद्द केली जाणार आहे.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा सुरु केला पण त्या विम्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना झाला नाही तर या विम्याचा लाभ जास्त विमा कंपन्यांना तसेच उद्योजकांना झाला आहे. या भाजपला सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही. भाजपने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात हमीभावही दिलेला नाही. कृषी साहित्यावर जीएसटी वाढवून शेतकऱ्यांना त्रास िदिला. खत, बी, बियाणी यांच्या किमती वाढविल्या म्हणून आज देशभर शेतकरी भाजपच्या विरोधात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४