शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Solapur: कॉँग्रेस सत्तेत आल्यास ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:32 IST

Solapur News: देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

- नारायण गावस पणजी - देशात कॉँग्रेस सरकार आले तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘किसान न्याय गॅरंटी’ लागू करणार. यातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या साेडविल्या जाणार आहे, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी आणी किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी पणजीतील कॉँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत गोवा प्रदेश कॉँग्रेसचे विरेंद्र शिरोडकर व इतर सदस्य उपस्थित होते.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांची गेली १० वर्षे फसवणूक केली म्हणून देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता कॉँग्रेस सरकार सत्तेवर आल्यावर किसान न्याय गॅरंटी मार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या जाणार. ऋणमुक्त आयोग लागू करुन शेतकऱ्यांचा सर्व कर्ज माफ केला जाणार आहे. शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत पिकावरील विमा दिला जाणार आहे. याेग्य प्रकारे आयात निर्यात पॉलिसी लागू करणार. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव दिला जाणार आहे. तसेच कृषी वापरावरील साहित्याची जीएसटी रद्द केली जाणार आहे.

शैलेश अग्रवाल म्हणाले, भाजपच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा सुरु केला पण त्या विम्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना झाला नाही तर या विम्याचा लाभ जास्त विमा कंपन्यांना तसेच उद्योजकांना झाला आहे. या भाजपला सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही. भाजपने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात हमीभावही दिलेला नाही. कृषी साहित्यावर जीएसटी वाढवून शेतकऱ्यांना त्रास िदिला. खत, बी, बियाणी यांच्या किमती वाढविल्या म्हणून आज देशभर शेतकरी भाजपच्या विरोधात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४