शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 8:59 AM

वीजपुरवठा न तोडण्याची पालकमंत्र्यांची सूचना

ठळक मुद्देदुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

सोलापूर : जिल्ह्यात जून व जुलै महिन्यातील पर्जन्यमान ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाले व आता जून ते सप्टेंबर महिन्याचा विचार करता सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. टंचाईस्थितीतील स्थलांतर, रोजगार, चारापाणी, पीक परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. 

 पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीला झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते.

बैठकीत आयत्यावेळच्या विषयात आमदार गणपतराव देशमुख यांनी पावसाअभावी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील टंचाई स्थितीकडे लक्ष वेधले. टंचाई ठरविण्याचे नियम केंद्र सरकारने बदलले आहेत. त्यानुसार ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे. उजनीच्या पाण्याचे नियोजन व्हायला हवे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तिसंगी, बुद्धेहाळ तलाव भरण्याबाबत विचार व्हावा. कृष्णेतील पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.

आमदार भारत भालके यांनीही दुष्काळ व हुमणीच्या संकटावर शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली. अशात वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. डीपी बंद ठेवण्यात येत असून, थकबाकीदार शेतकºयांना ५ व ३ हजार वीज बिल मागितले जात आहे. म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी ओढ्यात पाणी सोडण्याबाबत पत्र दिले आहे.

दुष्काळाबाबत उपाययोजना तातडीने करा अशी मागणी केली. आमदार नारायण पाटील यांनी पाणीटंचाईचा कृती आराखडा करा अशी मागणी केली. यावर आमदार गणपतराव देशमुख यांनी वीज कंपनीने शेतकºयांना बिले वाटप केली नाहीत आणि थकबाकीची मागणी कशी केली जात आहे असा सवाल केला. त्यावर वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३ हजार ९३ कोटी असल्याचे सांगितले. सध्या विजेची मागणी वाढली असून, दररोज रोखीने वीज खरेदी करावी लागत असल्याने थकबाकी वसुलीबाबत कंपनीने आदेश दिल्याचे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी कारखान्यांनी बिले दिली नाहीत, थकबाकी कोठून भरावी असा सवाल केला. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी वीजपुरवठा न तोडण्याची सूचना केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरी