शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘शिरापूर’चे पाणी एका दिवसातच झाले बंद; उत्तरमधील शेतकºयांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 10:43 IST

उत्तर तालुक्यातील शेतकºयांचा संताप; माढा तालुक्यात अडविले पाणी

ठळक मुद्देशेतकºयांनी अचानक बंधाºयावर दारे टाकल्याने पाणी बंद झाले होतेबोगद्यातून बाहेर पडलेले पाणी माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयांची दारे टाकून अडविलेपोलिसांच्या मदतीने अधिकाºयांनी दारे काढल्याचे सांगण्यात आले

सोलापूर: कॅनॉलचा दर्जा असलेल्या शिरापूर बंधाºयापर्यंत पोहोचलेले पाणी एका दिवसातच बंद झाले. बोगद्यातून बाहेर पडलेले पाणी माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयांची दारे टाकून अडविले. दरम्यान, रविवारी पोलिसांच्या मदतीने अधिकाºयांनी दारे काढल्याचे सांगण्यात आले.

भीमा-सीना बोगद्यातून उजनीचे २ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी गुरुवारी रात्री शिरापूर बंधाºयापर्यंत आले. शुक्रवारी दुपारी  बंधाºयावरील एक मोटार व सायंकाळपर्यंत ३ मोटारी सुरु करण्यात आल्या. दरम्यान, माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयाची दारे टाकली. 

एकीकडे माढा तालुक्यातील मोटारीने पाणी उपसा सुरू तर दुसरीकडे बंधाºयाची दारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह शनिवारी पूर्णपणे थांबला. वरून पाणी बंद झाल्याची  बाब शिरापूरच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचली. 

लागलीच शिरापूरच्या पदाधिकाºयांनी नदीवरील तीनही मोटारी शनिवारी बंद केल्या. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला मिळणारे पाणी शनिवारी दुपारी बंद झाले. शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी बीबीदारफळच्या पुढे नान्नजहून वडाळ्याकडे जात असतानाच मागे मोटारी बंद झाल्या. जिल्ह्यात सर्वात कमी ४० मि.मी. पाऊस मार्डी मंडलात पडला असल्याने अत्यंत पाण्याची गरज आहे. असे असताना प्रशासन या भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट मागील २०-२२ दिवसांपासून पाणी उपसा करणाºया माढा तालुक्यातील शेतकºयांनी वरती पाणी अडविले. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी ०.१५  टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.       तरतूद केल्याप्रमाणे पाणी मिळावे, अशी मागणी उत्तर तालुक्यातून होत आहे.

शेतकºयांनी अचानक बंधाºयावर दारे टाकल्याने पाणी बंद झाले होते. रविवारी आमच्या अधिकाºयांनी काही बंधाºयाची दारे काढल्याने पाणी शिरापूर बंधाºयाकडे येऊ लागले आहे. ठरल्याप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्याला पाणी मिळेल.- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

 पाण्याची सगळीकडूनच मागणी आहे. शिरापूर बंधाºयाच्या वरती पाणी अडविले होते. ते शिरापूर बंधाºयापर्यंत येत आहे. बंधाºयात आवश्यक तितके पाणी आल्यानंतर मोटारी सुरु करण्यात येतील.- जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ