शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धक्कादायक; पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘गायब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 19:30 IST

बोहल्यावर चढण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांनो लुटेरी दुल्हनपासून सावधान

मल्लिकार्जुन देशमुखे

सोलापूर : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरू झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे, दागिने घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’ असा प्रकार होईल तरी अशा लुटेरी दुल्हनपासून सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.

मुलांची वये वाढू लागलीत.. मुलींची संख्या कमी झालीय..मुलांना विवाहासाठी मुली मिळेनात. याच समस्येचा फायदा दलाल, एजंट, काही बोगस विवाह संस्था घेऊ लागले आहेत. मुलगी दाखवून लाखो रुपयांची मागणी करायची. लाखो रुपये उकळले की मुलीने विवाह झाल्यावर पळून जायचे. मुलींचे आई-वडील, मुलींचे घर सर्व काही नकलीच. या नव्या फंड्याला असंख्य मुलं व त्यांचा परिवार बळी पडतोय. काहीजण पोलिसांकडे जातात तर काही जण समाजात इज्जत जाऊ नये म्हणून गप्प बसतात.

---------------

लग्नासाठी मुली मिळेनात...

आज अनेक समाजांमध्ये मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींचा जन्मदरदेखील मुलांच्या तुलनेत कमी असल्याने लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या. अनेकदा मुलींकडून शेतकरी नको नोकरीवाला तोही शहरात राहणारा हवा, यासह अनेक अपेक्षा असल्यानेदेखील मुली मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात; मात्र अशा मुलांची नंतर फसवणूक होते.

------------

लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका...

लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात. आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

------------

कोठून आणल्या जातात या मुली...

अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरू असतात. केवळ लग्नाचे नाटक करण्यासाठी त्या मुलींना निश्चित असा मेहनताना दिला जातो. काम झाले की त्या गायब होतात. पैसे दिले, लग्न झाले, त्याच दिवशी नवरी गायब असे नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते.

-----------

सर्व समाजात विवाहयोग्य मुलींची वानवा आहे. त्यामुळे अनेक जण, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडतात. मुलगी गरीब घरची असली तरी चालेल; मात्र मुलाचे हात तर पिवळे होतील, अशा वर पित्याच्या काकुळतीचा गैरफायदा घेतला जातो. लग्न होताच नवरी दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा करते. त्यामुळे अशा बतावणीला, भूलथापांना बळी पडू नका. जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी, पालकांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा.

- रणजितसिंह माने, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा

 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी