शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक; सोलापूर जिल्ह्यातील २२२ कोरोना मृत्यूची पोर्टलवर नोंदच झाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 18:05 IST

आकडेवारीची तफावत: पहिल्या लाटेवेळी झाली होती मोठी चूक

सोलापूर: जिल्हा आरोग्य व मनपा आरोग्य विभागातर्फे शहर व ग्रामीणमधील मागील चोवीस तासातील कोरोनाग्रस्त व मृत्यूची आकडेवारी दररोज सायंकाळी प्रसिद्ध केली जाते. सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ५७० मृत्यूची नोंद आहे. पण प्रत्यक्षात पोर्टलवरील आकडेवारीवरून जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये ३ हजार ३४८ मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आकडेवारीत २२२ मृत्यूची तफावत दिसत असून, आकडेवारी अपडेट झाल्यावर ही समस्या दूर होते असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिकेच्या वेबसाईटवर कोरोनाने झालेले सुमारे ४७ मृत्यू नोंदलेच गेले नव्हते. याबाबत आरोग्य मंत्र्यापर्यंत तक्रार करण्यात आली. त्यानंतर तपासणी झाल्यावर महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पोर्टलवर माहिती भरण्याचे राहून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली. आताही हीच परिस्थिती दिसत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेली पॉझिटिव्ह रुग्ण व कोरोना मृतांचा आकडा पोर्टलवर कमी दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर पॉझिटिव्ह व मृतांची संख्या वाढत जाते. या काळात सर्वच रुग्णालयांकडून लवकर माहिती येत नाही. माहिती उपलब्ध होईल तसे पोर्टलवर भरण्यात येते. जाहीर प्रसिद्धीकरणासाठी मागील चोवीस तासातील आकडेवारी घेतली जाते. यातील मृत्यूची आकडेवारी रुग्णालये उशिरा कळवितात. त्यामुळे प्रसिद्धीकरणात मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी माहिती प्राप्त झाल्याचे दिसून येते. पण पोर्टलवर पॉझिटिव्ह आकडेवारी तातडीने भरली जाते. यामुळे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा पोर्टलवर पॉझिटिव्ह, कोरोनामुक्त झालेले व उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जादा दिसत आहे. मग मृत्यूची आकडेवारी कमी कशी दिसते असा सवाल उपस्थित होत आहे.

सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये

१७ मेच्या आकडेवारीनुसार शहरात १ हजार ३११ तर ग्रामीणमध्ये २ हजार २५९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. पॉझिटिव्ह: १ लाख ३४ हजार ७७० तर ॲक्टिव्ह: १७ हजार ८१८ व कोरोनामुक्त १ लाख १३ हजार २५६ रुग्ण असल्याचे जाहीर केले आहे. पण पोर्टलवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केेलेल्या बुलेटिनमध्ये मृत्यू ३ हजार ३४८, पॉझिटिव्ह: १ लाख ४१ हजार १२८, उपचार घेणारे २० हजार ९७८ तर कोरोनामुक्त १ लाख १६ हजार ७३९ रुग्ण दाखविले आहेत. सर्वच आकडेवारीत तफावत दिसत आहे.

ही पहा आकडेवारीतील तफावत...

जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यू: ३५७०

पोर्टलवरील नोंद: ३३४८

ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या तालुक्यात उपचारादरम्यान रुग्ण दगावतात. याची कंट्रोलरुमकडे माहिती येण्यास विलंब होतो. हीच परिस्थिती शहरातही आहे. रुग्णालयात उपचाराचा असलेला लोड पाहता रुग्णालये मृत्यूची माहिती एक दिवस उशिराने कळवितात. त्यानंतर खातरजमा करण्यात एक दिवस जातो. यामुळे आकड्यांची ही तफावत दिसून येते. माहिती भरेल तसे पोर्टलवर आकडेवारी अपडेट होते.

डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या