शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘खड्ड्यात गेली युती’ म्हणणारी शिवसेना आता सत्तेसाठी लाचार; अशोक चव्हाण यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:04 IST

सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देंगे, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी ...

ठळक मुद्देआघाडीची पहिली सभा नांदेडमध्ये होणार - अशोक चव्हाणमित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती -अशोक चव्हाणआघाडीच्या जागावाटपाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होईल - अशोक चव्हाण

सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देंगे, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे एका खासगी कार्यक्रमासाठी सोलापुरात आले आहेत. शिवसेना-भाजप युती होणार यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचा भाजपविरोध किती पोकळ होता, हे यावरून दिसून येईल. 

समृद्धी महामार्गाचा विषय असो, भूसंपादन प्रक्रियेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला शिवसेनेने तीव्र विरोध केला. त्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यात शिवसेनेची दुटप्पी भूमिका दिसून येते. शिवसेनेने इतके वाभाडे काढूनसुद्धा भाजपा त्यांच्यासोबत जाते, यामध्ये दोघांची लाचारी दिसून येते.

शिवसेनेच्या बाबतीत अमित शहा व इतरांनी केलेली भाषणे पाहता सर्वसामान्यांनाही यांच्या युतीबद्दल धक्का बसला आहे. सत्तेसाठी हपापलेली शिवसेना इतका अपमान झाल्यावरही भाजपासोबत जाते. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची वेळ आल्याने सत्तेसाठी शिवसेना लाचार होताना दिसत आहे. 

मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागावाटपाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. काँग्रेस मित्र आघाडी पक्षाची पहिली प्रचार सभा २0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील, शेकापचे जयंत पाटील, पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी परळी व २४ फेब्रुवारी रोजी लातूर येथे सभा होणार आहे. या दिवशी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 

मनसेबरोबर आघाडी नाही- मनसेबरोबर आघाडीचा काँग्रेसचा प्रस्ताव नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस व मनसेचे तात्त्विक मतभेद आहेत ते दूर झालेले नाहीत. मुंबईचा मनसेचा इतिहास पाहता आपण आघाडीबाबत अजिबात उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेबाबत आघाडीचे वक्तव्य केले होते आम्ही त्याला होकार कळविलेला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण