शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:36 IST

शिवसेना आमदारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला.

ठळक मुद्दे५७ लाख रुपये वाटून निवडणूक लढवलीमतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले

पंढरपूर: साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये होत असलेला पैशांचा वापर आणि निवडणुकांचे धक्कादायक वास्तव समोर आणणारा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. शिवसेना आमदारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांची माफीही मागितली. निवडणूक लढवताना एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या, असे शिवसेना आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी मान्य केले. 

काही वर्षांपूर्वी झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या (Sangola Sugar Factory Election) निवडणुकीत मतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना हव्या तितक्या पार्ट्याही दिली. त्या काळात ५७ लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील  यांनी केला आहे. सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

त्या काळात ५७ लाख रुपये वाटून निवडणूक लढवली

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकीदरम्यान १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले, असे सांगत कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. आपणही तितकेच पापी असल्याची कबुली पाटील यांनी दिली. 

कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार

साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि पार्ट्या करून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला, हे सांगताना आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैरकारभार केला, याची उदाहणे दिली. कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटील यांच्या कबुलीनंतर सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे जळजळीत वास्तव आणि सत्य समोर आले आहे.

दरम्यान, वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती अभिजित पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला २५ वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरू केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाSugar factoryसाखर कारखानेPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर