शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे दरवाजे उघडले तर शरद पवार, चव्हाणांशिवाय कोणीच उरणार नाही - शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 06:34 IST

महाजनादेश यात्रेचा समारोप; महाडिक, गोरे, राणा पाटील यांचा प्रवेश

सोलापूर : काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने आजपर्यंत फक्त घराणेशाही जोपासली. मुलगा, मुलगी, पुतण्या यांचेच भले झाले आहे. जलसिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. आदर्श घोटाळ्यामुळे सैनिकांचे नुकसान झाले. भाजपचे दरवाजे आम्ही थांबविले आहेत. जर उघडले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी सोलापुरात केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूरच्या पार्क मैदानावर झाला. यावेळी माण-खटावचे कॉँग्रेस आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि उस्मानाबादचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी नेते उपस्थित होते.

अमित हा यांनी भाषणात राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, जम्मू- काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर काँग्रेसचे खा. राहुल गांधी, शरद पवार हे टीका करीत आहेत. देश हिताच्या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे होते; मात्र काँग्रेस विरोध करीत आहे. राहुल गांधी यांच्या विधानांचा वापर पाकिस्तान करीत आहे, यामुळे महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीपूर्वी या पक्षांनी काश्मिरमधील ३७० कलमाबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे, असे आव्हानही शहा यांनी दिले.

पोरं भाजपमध्ये जात आहे, या शरद पवार यांनी केलेल्या टिकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, उदयनराजे, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक ही मंडळी काय पोरं आहेत का? उगी काही बोलू नका. या मंडळींना येत्या विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे हे माहिती आहे. संपूर्ण विचाराअंती त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ज्यांना असे वाटत असेल त्यांनी लक्षात घ्यावे.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण पूर्ण करणार : मुख्यमंत्रीकृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंत पाटील यांना काय समजते? गेल्या मंत्रिमंडळात डझनभर मंत्री पश्चिम महाराष्टÑाचे होते, परंतु त्यांनी काय केले? आम्ही या भागातील सगळे प्रकल्प पूर्ण करू. भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प पूर्ण करू. या भागातील पाणी मराठवाड्याला नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड आणला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन् सोलापुरात जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असं कसं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार