शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपचे दरवाजे उघडले तर शरद पवार, चव्हाणांशिवाय कोणीच उरणार नाही - शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 06:34 IST

महाजनादेश यात्रेचा समारोप; महाडिक, गोरे, राणा पाटील यांचा प्रवेश

सोलापूर : काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने आजपर्यंत फक्त घराणेशाही जोपासली. मुलगा, मुलगी, पुतण्या यांचेच भले झाले आहे. जलसिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. आदर्श घोटाळ्यामुळे सैनिकांचे नुकसान झाले. भाजपचे दरवाजे आम्ही थांबविले आहेत. जर उघडले तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणीही उरणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी सोलापुरात केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप रविवारी सोलापूरच्या पार्क मैदानावर झाला. यावेळी माण-खटावचे कॉँग्रेस आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि उस्मानाबादचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी नेते उपस्थित होते.

अमित हा यांनी भाषणात राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, जम्मू- काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर काँग्रेसचे खा. राहुल गांधी, शरद पवार हे टीका करीत आहेत. देश हिताच्या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे होते; मात्र काँग्रेस विरोध करीत आहे. राहुल गांधी यांच्या विधानांचा वापर पाकिस्तान करीत आहे, यामुळे महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीपूर्वी या पक्षांनी काश्मिरमधील ३७० कलमाबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे, असे आव्हानही शहा यांनी दिले.

पोरं भाजपमध्ये जात आहे, या शरद पवार यांनी केलेल्या टिकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, उदयनराजे, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक ही मंडळी काय पोरं आहेत का? उगी काही बोलू नका. या मंडळींना येत्या विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे हे माहिती आहे. संपूर्ण विचाराअंती त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ज्यांना असे वाटत असेल त्यांनी लक्षात घ्यावे.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण पूर्ण करणार : मुख्यमंत्रीकृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंत पाटील यांना काय समजते? गेल्या मंत्रिमंडळात डझनभर मंत्री पश्चिम महाराष्टÑाचे होते, परंतु त्यांनी काय केले? आम्ही या भागातील सगळे प्रकल्प पूर्ण करू. भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प पूर्ण करू. या भागातील पाणी मराठवाड्याला नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड आणला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन् सोलापुरात जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असं कसं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार