शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:43 PM

२५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान: खरिपाचे नुकसान तर रब्बीची पिके धोक्यात

ठळक मुद्देकाढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटलेआकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले

सोलापूर :  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे बुधवारी पूर्ण होत असतानाच वादळी पावसाने झोडपल्याने हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान तर पेरणी झालेली रब्बीची पीके धोक्यात आली आहेत. अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. 

सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपले. यामध्ये काढणीला आलेल्या उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी खात्यामार्फत  सुरू करण्यात आले होते. प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले होते. पण बुधवारी सर्व तालुक्यातून आकडेवारी हाती आल्यावर २५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. 

खळ्यात कुजल्या राशीसप्टेंबरमधील पिकांच्या नुकसानीची आकडेवारी जुळवत असतानाच मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जिल्ह्याला पावसाने झोडपले. जिल्ह्यात संततधार कायम असून, सप्टेंबर महिन्यापेक्षा या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन शेतातच राहिले तर काढलेले धान्य खळ्यात कुजले आहे. 

शेततळी रिकामी करासंततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक तलाव भरले आहेत. त्यामुळे सांडवे मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक शेतक?्यांच्या शेतात शेततळी आहेत. सततच्या पावसाने या शेततळ्यांना धोका असून, यातील पाणी शेतकºयांनी रिकामे करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कांदा, ऊस भुईसपाटअशीच परिस्थिती मका, भुईमुगाची झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उसंत दिल्यावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या उगवणीला फटका बसणार आहे. याचबरोबर शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा व ऊस आडवा झाला आहे. तूर, द्राक्ष, डाळिंब, केळी, बोर, सीताफळ, भाजीपाल्यांनाही फटका बसला आहे. 

पुन्हा पंचनामे होणारसप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ही आकडेवारी शासनाला पाठविण्यात येणार आहे. आता मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मोठा फटका बसला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पंचनामे करण्यात येतील अशी माहिती कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर