शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सोलापुरातील ‘सिद्धेश्वर’ साखर कारखान्याची साखर जप्त करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:35 IST

जिल्हाधिकाºयांचे आदेश; औसा येथील शेतकºयांच्या तक्रारीची दखल

ठळक मुद्दे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सात महिने झाले बिल मिळत नसल्याची तक्रारउसाचे बिल मिळावे म्हणून शेतकºयांनी कारखान्याकडे हेलपाटे मारले. पण कार्यकारी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीडिसेंबर २०१८ अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची एफआरपी १२ कोटी ८६ लाख थकीत आहे

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सात महिने झाले बिल मिळत नसल्याची तक्रार लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी केल्यावर कारखान्याच्या गोदामातील साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

लातूर जिल्ह्यातील चिंचोळी काजळे, मासुर्डी, आशीव, मातोळा, खुंटेगाव व उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली येथील शेतकरी मंगळवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. निवेदन देताना अमरसिंह भोसले, दत्तू गोरे, सुरेश चव्हाण, कल्याण मगर, सुरेश पाटील, पोपट मगर, शेषराव गोरे, विठ्ठल गोरे, मोहन माने, सुरेश जगताप, महादेव साळुंके, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे आदी शेतकरी उपस्थित होते. भोसले यांनी शेतकºयांची कैफियत मांडली. 

२५ जानेवारीपासून माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या कारखाना स्थळावरून पावत्या करून सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याला ऊस नेला. 

त्यानंतर उसाचे बिल मिळावे म्हणून शेतकºयांनी कारखान्याकडे हेलपाटे मारले. पण कार्यकारी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वी तीनवेळा निवेदन दिले. त्यावर तहसीलदारांसमवेत कारखान्याने पंधरा दिवसात बिल देण्याचे मान्य केले होते. पण ३० जुलै झाले तरी बिल मिळाले नाही. सात महिने झाल्याने शेतकºयांच्या समस्या वाढल्या आहेत. बँकांचे हप्ते थकीत राहिल्याने तगादा लावला जात आहे. मुलांचे शिक्षण व पेरणीसाठी पैसा नाही. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  सर्वांचा शेतीवरच उदरनिर्वाह  असल्याने पैसे नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे म्हणणे मांडले. 

त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश दिले. डिसेंबर २०१८ अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची एफआरपी १२ कोटी ८६ लाख थकीत आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी आरआरसीअंतर्गत कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. औसा येथील शेतकºयांची बिले जानेवारी महिन्यातील आहेत. त्यामुळे याची दखल घेत कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. 

ऊस पुरवठादार शेतकºयांच्या अडचणी समजू शकतो. कारखान्याला १० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर झाले आहे. पण शासनाच्या अध्यादेशामुळे कर्जमंजुरीला मुदतवाढ मिळाल्याने अडचण निर्माण झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाली की, शेतकºयांची बिले वाटप केली जाणार आहेत. - धर्मराज काडादीचेअरमन, सिद्धेश्वर साखर कारखाना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय