शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील ‘सिद्धेश्वर’ साखर कारखान्याची साखर जप्त करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:35 IST

जिल्हाधिकाºयांचे आदेश; औसा येथील शेतकºयांच्या तक्रारीची दखल

ठळक मुद्दे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सात महिने झाले बिल मिळत नसल्याची तक्रारउसाचे बिल मिळावे म्हणून शेतकºयांनी कारखान्याकडे हेलपाटे मारले. पण कार्यकारी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीडिसेंबर २०१८ अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची एफआरपी १२ कोटी ८६ लाख थकीत आहे

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सात महिने झाले बिल मिळत नसल्याची तक्रार लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी केल्यावर कारखान्याच्या गोदामातील साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

लातूर जिल्ह्यातील चिंचोळी काजळे, मासुर्डी, आशीव, मातोळा, खुंटेगाव व उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली येथील शेतकरी मंगळवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. निवेदन देताना अमरसिंह भोसले, दत्तू गोरे, सुरेश चव्हाण, कल्याण मगर, सुरेश पाटील, पोपट मगर, शेषराव गोरे, विठ्ठल गोरे, मोहन माने, सुरेश जगताप, महादेव साळुंके, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे आदी शेतकरी उपस्थित होते. भोसले यांनी शेतकºयांची कैफियत मांडली. 

२५ जानेवारीपासून माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या कारखाना स्थळावरून पावत्या करून सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याला ऊस नेला. 

त्यानंतर उसाचे बिल मिळावे म्हणून शेतकºयांनी कारखान्याकडे हेलपाटे मारले. पण कार्यकारी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वी तीनवेळा निवेदन दिले. त्यावर तहसीलदारांसमवेत कारखान्याने पंधरा दिवसात बिल देण्याचे मान्य केले होते. पण ३० जुलै झाले तरी बिल मिळाले नाही. सात महिने झाल्याने शेतकºयांच्या समस्या वाढल्या आहेत. बँकांचे हप्ते थकीत राहिल्याने तगादा लावला जात आहे. मुलांचे शिक्षण व पेरणीसाठी पैसा नाही. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  सर्वांचा शेतीवरच उदरनिर्वाह  असल्याने पैसे नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे म्हणणे मांडले. 

त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश दिले. डिसेंबर २०१८ अखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याची एफआरपी १२ कोटी ८६ लाख थकीत आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी आरआरसीअंतर्गत कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. औसा येथील शेतकºयांची बिले जानेवारी महिन्यातील आहेत. त्यामुळे याची दखल घेत कारखान्याची साखर जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. 

ऊस पुरवठादार शेतकºयांच्या अडचणी समजू शकतो. कारखान्याला १० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर झाले आहे. पण शासनाच्या अध्यादेशामुळे कर्जमंजुरीला मुदतवाढ मिळाल्याने अडचण निर्माण झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाली की, शेतकºयांची बिले वाटप केली जाणार आहेत. - धर्मराज काडादीचेअरमन, सिद्धेश्वर साखर कारखाना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय