शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 17:36 IST

शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची पालकांना चिंता

सोलापूर : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. बहुतांशी मुलांच्या हाती लहान वयातच स्मार्ट फोन मिळाले. यामुळे अल्पवयीन मुलांना ही सोशल मीडियाची ओढ वाढत असून, परिणामी कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

स्पर्धेच्या युगात आपला पाल्य इतरांपासून मागे तर पडणार नाही ना? या भीतीपोटी पालक मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने लक्ष ठेवत असून, प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना सातत्याने सतावत आहे. पालकांचे सगळे ऐकणारी मुले हातामध्ये मोबाइल पडल्यानंतर पालकांना उलटी उत्तरे देण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या ही मुले लहान आहेत; पण भविष्यात या बाबींची त्यांना सवय लागून त्यांचा स्वभाव हा त्यांचा गुण-दोष ठरू शकतो. याच तणावातून पालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडत आहे. मुलांना त्यांच्यावरील बंधनांमध्ये अनावश्यक वाढ झाल्याची भावना निर्माण होऊन मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मुलांच्या समस्या

ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासा- व्यतिरिक्त सोशल मीडियाची ओढ आणि ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले असून, परिणामी कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढून चिडचिड वाढली आहे.

पालकांच्या समस्या

ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या स्पर्धेत पाल्य इतरांच्या तुलनेत मागे राहण्याची भीती पालकांमध्ये वाढीस लागली आहे. मुलांमध्ये डिप्रेशन, बेचैनी, चिंता विकार, संशयाचा आजाराचे प्रमाण पूर्वी पाच टक्के मुलांमध्ये आढळत होते. आता पंधरा टक्के मुलांमध्ये ही लक्षणे दिसत आहेत. यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात..

गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षक, शालेय मित्र व सभोवतालच्या वातावरणाशी संपर्क तुटला आहे. त्याचा परिणाम मुलांमध्ये डिप्रेशन, बैचेनी, चिंता विकार आजार वाढत आहेत. मुलांमध्ये मानसिक, भावनिक व सामाजिक भावना व्यक्त करता येत नाहीत. पालकांनी मुलांसोबत संवाद वाढविणे आवश्यक आहे. - डॉ. स्वाती गंगाधर कोरके, मानसोपचार तज्ज्ञ.

 

ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे त्यात फक्त एकतर्फी शिकविले जात आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्रास वाढला आहे. पालकांनी मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे.

- डॉ. शुभदा खंदारे, मेंदुरोगतज्ज्ञ

इयत्तानिहाय मुलांची संख्या

  • पहिली - ७०६०६
  • दुसरी - ७६१६७
  • तिसरी - ७६०९८
  • चौथी - ७७३११
  • पाचवी- ७७१९७
  • सहावी - ७६४२०
  • सातवी- ७६२६७
  • आठवी ७४६४३
  • नववी ७६५७६
  • दहावी ७१०५०
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यEducationशिक्षणSchoolशाळा