शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील शालेय मुलांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 16:55 IST

शिक्षण विभागाचे आदेश ; १३ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी शाळा या पूर्णवेळ भरवण्यात येत आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून दरवर्षीप्रमाणे एकवाक्यता व सुसंगत आणण्यासाठी यंदा उन्हाळी सुट्या २ मे पासून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

सध्या पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णक्षमतेने भरविण्यात येत आहेत. या वर्गाच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. पूर्वी या परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जास्त मिळत होते. पण यंदा या शाळा ३० एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे यंदा परीक्षा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात होतील आणि त्यानंतर १ मे रोजी या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचे सूचना देण्यात आले आहेत. आणि २ मे ते १२ जूनपर्यंत उन्हाळी सुट्या असणार आहे.

१३ जूनपासून शाळा होणार सुरू

विद्यार्थ्यांना २ मे ते १२ जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुटी असणार आहेत. १३ जूनपासून राज्यात सर्वत्र शाळा सुरू करण्यात येणार आहे. पण विदर्भातील तापमान लक्षात घेता उन्हाळ्याची सुटी तेथील विद्यार्थ्यांना रविवार, दि. २६ जूनपर्यंत असणार आहेत आणि सोमवार, दि. २७ जूनपासून त्यांच्या शाळा सुरू होतील, असे आदेशात म्हटले आहे.

माध्यमिक शाळा संहितांतर्गत शैक्षणिक वर्षातील एक वर्षात एकूण ७६ सुट्या असतात. यंदा या सुट्या कमी मिळाल्यामुळे या सुट्या गणेशोत्सव अगर नाताळ या सणाच्याप्रसंगी समायोजन जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने करण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेण्यात यावे. एक मे ला परीक्षांचा निकाल जाहीर करावा, असे सांगण्यात आले आहे. पण दोन आठवड्यामध्ये परीक्षा घेऊन निकाल लावणे कसे शक्य आहे? असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा