शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शाळा म्हणजे मोठी आई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:59 IST

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. ...

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. शाळा आपल्या आयुष्यात आली नसती तर आपण घडूच शकलो नसतो.आम्हाला घडविणाºया कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने नुकताच माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा झाला.

या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून एक आॅडिओ व्हायरल करण्यात आली. ती शाळेची म्हणजेच मोठ्या आईची  हाक होती. तिच्या हाकेचा आदर करीत मीही कार्यक्रमासाठी शाळेत गेलो. खूप दिवसानंतर मोठ्या आईचा मातृस्पर्श अनुभवला. अनेक माजी विद्यार्थी जमले होते. सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. कार्यक्रम संपन्न झाला. शाळेची इमारत, त्याकाळच्या आठवणी,आम्हाला घडविणारे शिक्षक, वर्गातील मित्रमैत्रिणी, मोठ्या आईच्या कुशीतला तो संपूर्ण परिसर पुन्हा एकदा अनुभवला.

शाळेने दिलेल्या विषयज्ञानाबरोबर केलेल्या संस्कारांचे ऋण कधीच विसरता येणार नाही. त्याची परतफेड करता येत नाही. परंतु मोठ्या आईच्या हाकेनुसार योगदान घ्यावे ज्यामुळे तिला समाधान वाटेल. तसे तिला स्वत:साठी काहीच नकोय. तिला काळजी शाळेतल्या  गरीब वंचित मुला-मुलींची.या गरजू लेकरांना सक्षम माजी विद्यार्थ्यांनी  मदत आणि मार्गदर्शन करावी हीच तिची माफक इच्छा. मदत म्हणजे फक्त आर्थिक नव्हे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी गरजेनुसार सुविधा द्याव्यात. त्याहीपेक्षा गरजेचे म्हणजे आपल्या शाळेत शिकणाºया गरीब कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या  करिअरसाठी यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शनाची. विशेषत: विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी, येत्या काळातील संभाव्य नोकºया रोजगाराची संधी, अशा संबंधित विषयावर यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांशी बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा खूप वाढली. त्याविषयी मुलांना जाणीव दिली पाहिजे. हीच मोठ्या आईची हाक आहे.

शंभर वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पदरमोड करून येणारी पिढी शिक्षित करण्यासाठी  शिक्षणसंस्था उभारल्या. त्यानंतरही अनेक समाजबांधवांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाची भर घातली. शिक्षकांनीही कष्ट केले. पालकांनी विश्वास दाखविला. होतकरू विद्यार्थ्यांच्या योगदानातून शाळेचा नावलौकिक  झाल्यामुळे मोठ्या आईचा उर भरून येतो. त्याचबरोबरीने हल्ली वाढत चाललेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ती व्यथित होते.

शिक्षकांना १२० हून अधिक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याची खंत तिला आहे. भोवतालच्या वास्तव परिस्थितीमुळे मुलं दिवसेंदिवस हिंसक बनत चालली आहेत. पालक हवालदिल झालेत. ‘ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताचे स्थान आठव्या क्रमांकावर आहे. याचे कारण आपल्या शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा देखील खालावत चालली आहे. आपण मुलांना मुलांसारखं,त्यांच्या वयानुसार,बुद्धीच्या क्षमतेनुसार वाढू देत नाही. त्यांना जे येतंय,आवडतंय त्यापेक्षा पालक आणि समाजाला काय हवंय ते करायला लावतोय. त्यामुळे मुलंही बिथरली. एकंदरीत शैक्षणिक पातळीवरील विदारक आणि शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ शासन,शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि कर्मचारी वर्गावर मुलांचे भवितव्य सोडून देणे धोक्याचे सिद्ध झाले आहे.विद्यमान शिक्षणव्यवस्था ही परिस्थिती बदलण्यात अयशस्वी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या आईच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे नक्की.  - प्रा. विलास बेत  (लेखक हे सामाजिक शास्त्राचे तज्ज्ञ आहेत़)

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी