शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा म्हणजे मोठी आई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:59 IST

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. ...

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. शाळा आपल्या आयुष्यात आली नसती तर आपण घडूच शकलो नसतो.आम्हाला घडविणाºया कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने नुकताच माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा झाला.

या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून एक आॅडिओ व्हायरल करण्यात आली. ती शाळेची म्हणजेच मोठ्या आईची  हाक होती. तिच्या हाकेचा आदर करीत मीही कार्यक्रमासाठी शाळेत गेलो. खूप दिवसानंतर मोठ्या आईचा मातृस्पर्श अनुभवला. अनेक माजी विद्यार्थी जमले होते. सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. कार्यक्रम संपन्न झाला. शाळेची इमारत, त्याकाळच्या आठवणी,आम्हाला घडविणारे शिक्षक, वर्गातील मित्रमैत्रिणी, मोठ्या आईच्या कुशीतला तो संपूर्ण परिसर पुन्हा एकदा अनुभवला.

शाळेने दिलेल्या विषयज्ञानाबरोबर केलेल्या संस्कारांचे ऋण कधीच विसरता येणार नाही. त्याची परतफेड करता येत नाही. परंतु मोठ्या आईच्या हाकेनुसार योगदान घ्यावे ज्यामुळे तिला समाधान वाटेल. तसे तिला स्वत:साठी काहीच नकोय. तिला काळजी शाळेतल्या  गरीब वंचित मुला-मुलींची.या गरजू लेकरांना सक्षम माजी विद्यार्थ्यांनी  मदत आणि मार्गदर्शन करावी हीच तिची माफक इच्छा. मदत म्हणजे फक्त आर्थिक नव्हे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी गरजेनुसार सुविधा द्याव्यात. त्याहीपेक्षा गरजेचे म्हणजे आपल्या शाळेत शिकणाºया गरीब कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या  करिअरसाठी यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शनाची. विशेषत: विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी, येत्या काळातील संभाव्य नोकºया रोजगाराची संधी, अशा संबंधित विषयावर यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांशी बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा खूप वाढली. त्याविषयी मुलांना जाणीव दिली पाहिजे. हीच मोठ्या आईची हाक आहे.

शंभर वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पदरमोड करून येणारी पिढी शिक्षित करण्यासाठी  शिक्षणसंस्था उभारल्या. त्यानंतरही अनेक समाजबांधवांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाची भर घातली. शिक्षकांनीही कष्ट केले. पालकांनी विश्वास दाखविला. होतकरू विद्यार्थ्यांच्या योगदानातून शाळेचा नावलौकिक  झाल्यामुळे मोठ्या आईचा उर भरून येतो. त्याचबरोबरीने हल्ली वाढत चाललेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ती व्यथित होते.

शिक्षकांना १२० हून अधिक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याची खंत तिला आहे. भोवतालच्या वास्तव परिस्थितीमुळे मुलं दिवसेंदिवस हिंसक बनत चालली आहेत. पालक हवालदिल झालेत. ‘ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताचे स्थान आठव्या क्रमांकावर आहे. याचे कारण आपल्या शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा देखील खालावत चालली आहे. आपण मुलांना मुलांसारखं,त्यांच्या वयानुसार,बुद्धीच्या क्षमतेनुसार वाढू देत नाही. त्यांना जे येतंय,आवडतंय त्यापेक्षा पालक आणि समाजाला काय हवंय ते करायला लावतोय. त्यामुळे मुलंही बिथरली. एकंदरीत शैक्षणिक पातळीवरील विदारक आणि शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ शासन,शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि कर्मचारी वर्गावर मुलांचे भवितव्य सोडून देणे धोक्याचे सिद्ध झाले आहे.विद्यमान शिक्षणव्यवस्था ही परिस्थिती बदलण्यात अयशस्वी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या आईच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे नक्की.  - प्रा. विलास बेत  (लेखक हे सामाजिक शास्त्राचे तज्ज्ञ आहेत़)

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी