शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:08 IST

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले.

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील सामील झाले होते. यावेळी दिवंगत देशमुख यांच्या मुलीने न्यायाची मागणी करत पंढरपूरच्या विठुरायाकडे साकडं घातलं आहे. "माझ्या वडिलांनी गावचे कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं आहे. एका दलित बांधवाला वाचवण्यासाठी ते गेले होते. अशा माझ्या वडिलांवर आज जातीयवादाचा आरोप केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी," असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले.

आक्रोश मोर्चामध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मराठा समाजाचे नेते नागेश भोसले, प्रणव परिचारक, प्रशांत गिड्डे, किरण घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी संजीव भोर म्हणाले की, "विशेष सरकारी वकिलांची नेमणूक न झाल्याने तपासामध्ये ज्या काही उणिवा, त्रुटी राहतील त्याचा फायदा आरोपींना मिळू शकतो. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला देशमुख कुटुंबाचा जर आक्षेप असेल तर त्यांच्याशी इतर नावांवर चर्चा करून तत्काळ सरकारी वकिलाची नेमणूक करावी. हत्येची घटना घडल्यापासून प्रत्येक बाबतीत सरकार दिरंगाई करत आहे. या प्रकरणात अनेक पोलिस अधिकारी आरोपींबरोबर फिरताना दिसत असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या पोलिसांना सहआरोपी करावे. वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र त्याच्यावर खुनाचा कट रचणे, खून करणे असे गुन्हे दाखल केले नाहीत," असा गंभीर आरोपदेखील यावेळी संजीव भोर यांनी केला. 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसतील तर आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

"संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकिलाची लवकरात लवकर नेमणूक करावी. आरोपीला फाशीवर लटकवण्यासाठी कुठलीही अडचण येत कामा नये. मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींना फासावर लटकवू असा शब्द दिला आहे. या शब्दावर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. यासाठी तात्काळ विशेष सरकारी वकिलाची नेमणूक गरजेचे आहे," अशा भावना मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी