शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोलापूर शहरातील समाधींनी घेतला मोकळा श्वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 2:25 PM

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी स्वच्छता मोहिम; ३३़०० स्दस्यांनी १४० टन कचरा केला गोळा

ठळक मुद्दे५५० साधकांनी गोळा केला ४ टन कचरापावसाला न जुमानता केली स्वच्छताकुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार

सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण शहरात असलेल्या ११ स्मशानभूमीची स्वच्छता केली.

  • -  कुणाच्या हातात फावडा, कुणाच्या हातात कुºहाड, झाडू, टोपली, सत्तूर, कुणी कुणाला काही सांगत नाही. स्वच्छता करण्यात सगळेच मग्न. लष्करी शिस्त कशी असते याचे उदाहरण म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान. मोदी स्मशानभूमीत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. काटेरी झुडपांनी वर्षानुवर्षे वेढलेल्या समाधींनी मोकळा श्वास घेतला.
  • - सकाळी सात वाजता सुरू झालेले अभियान दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. स्मशानभूमीच्या बाहेर कार, मोटरसायकल, सायकली पार्क करण्यात आल्या होत्या. अभियान राबविताना कारमधून आलेला साधक आणि सायकलवरून आलेला सदस्य यांच्यात भेद नव्हता. तितक्याच तळमळीने सर्व सदस्य अभियान राबवत होते. 

५५० साधकांनी गोळा केला ४ टन कचरा- धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये येणाºया वेगवेगळ्या ठिकाणच्या सदस्यांनी मोदी स्मशानभूमीत स्वच्छता केली. यात ताकमोगे वस्ती, गोविंद पार्क, सलगर वस्ती, अभिमानश्री येथील साधकांचा सहभाग होता. सुमारे ५५० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. महापालिकेची जेसीबी मशीन व ट्रक यांनीही या अभियानाला मदत केली. या अभियानातून चार टन कचरा गोळा करण्यात आला.

पावसाला न जुमानता केली स्वच्छता- अभियानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासूनची होती. तर पहाटे सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली; मात्र सदस्यांच्या मनात पावसाची काळजी नव्हती. दिलेल्या वेळी त्यांनी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आणि तडीस नेले सुद्धा. पाऊस पडत असल्याने स्वच्छता अभियान होईल की नाही याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती.

कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार- स्मशानभूमीत अस्ताव्यस्त पडलेल्या तिरडीची लाकडे साधकांनी गोळा केली. ही लाकडे फेकून न देता यापासून लाकडाचे कुंपण बनवण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांना धोका पोहोचू नये, यासाठी तयार करण्यात येणाºया कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार देण्यात येत आहे.

इतक्या साहित्यांचा  झाला वापर- स्वच्छता अभियान राबवताना काही साहित्यांचा वापर करण्यात आला. काहींना प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरवण्यात आले तर काहींनी घरुन येतानाच साहित्य आणले होते. मोदी स्मशानभूमीत ५०० जणांनी फावडे - ४८ , कुºहाड - ८०, टोपली - १६०, सत्तूर - ६० , झाडू - ६० अशा ४०८ साहित्यांचा वापर  करण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान