शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 08:10 IST

आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती.

- विलास मासाळमंगळवेढा (जि़ सोलापूर) : साहेब, चार पैशानं पोट भरतं का ओ, शासनानं हाताला काम द्यावं, आम्हाला अजूनही रेशनकार्ड नाही, कोणतेही दाखले मिळत नाहीत, असे सांगत धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडातील घटनेच्या आठवणीने भटक्या विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पीडित नातेवाईकांना गहिवरून आले अन् त्यांनी आक्रोश सुरू केला. आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. त्यातून हे सामूहिक हत्याकांड झाले.मंगळवेढा तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, अगनू इंगोले व राजू भोसले हे पाच जण १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा (ता़ साक्री, जि. धुळे) येथे भिक्षा मागण्यासाठी गेले असताना लहान मुलांना पळवून नेणारी टोळी समजून ग्रामस्थांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली़ त्यात पाच जणांचा मृत्यू झाला़ शासनाने मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली. शिवाय मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीत समावून घेतले जाईल. कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल. शेतजमीन देण्यात येईल, अशी घोषणा शासनाने केली होती. पण त्यांच्या पदरी काहीच मिळाले नसल्याची खंत वारसदार नर्मदा भोसले, संगीता भोसले, शांता माळवे यांनी व्यक्त केली.वर्ष उलटूनही अद्याप आठ जण फरारचधुळे : राईनपाडा गावात आजही तणावाची स्थिती आहे़ संशयित २८ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून ८ फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील चार आणि कर्नाटक राज्यातील एक अशा पाच जणांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर राईनपाडा आणि परिसरातील ग्रामस्थ, तरुण फरार झाले होते. येथील आठवडे बाजार मात्र अजून सुरू झालेला नाही़रेशनकार्ड मिळाले नाहीमृतांचे नातेवाईक शांता माळवे, दिगंबर माळवे, नर्मदा भोसले, सुनील भोसले, लक्ष्मण भोसले, मारूती भोसले, शहानूर फकीर यांची अवस्था फारच बिकट आहे़ घटनेनंतर अनेक राजकीय पुढारी, नेत्यांनी आश्वासने दिली़ मात्र वर्षभरात साधे रेशन कार्डही मिळाले नाही़ जातीच्या दाखल्यासह अन्य दाखलेही मिळेनात़ रोजगारासाठी सर्वांना भटकंती करावी लागत आहे़, असे कुटुंबीयांनी सांगितले.देवानं नव्हं दुष्ट लोकांनी मारलं...शासनाच्या पैशापेक्षा आयुष्यभर साथ देणारा जोडीदार गेला़ आमच्या यांना देवानं नव्हं तर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मारलं़ त्यांच्याशिवाय आमचं जीवन पूर्ण होत नाही़ शासनानं आयुष्यभर पैसा दिला तरी मानसिक समाधान होत नाही़ आमची अनेक वर्षांपासून परवड सुरू आहे़ आता तर त्यात जास्तच भर पडल्याचे सीताबाई माळवे सांगत होत्या़ त्यांच्या डोळ््यात पाणी आलं होतं.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़ कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये़ राईनपाडासह परिसरात जनजागृती करण्यात आली आहे़ २८ संशयितांना जेरबंद केले आहे़ सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे़ - विश्वास पांढरे, पोलीस अधीक्षक, धुळे

टॅग्स :Solapurसोलापूर