शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उजनीच्या पाण्याने ओढे, नाले, तलाव, बंधारे भरुन घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:14 IST

सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांचा ‘लोकमत’ शी संवाद

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहेजनी धरण 96% भरले असून वरुन पाण्याचा प्रवाह वाढतच आहेबोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीकाठच्या शेतीसाठी उपयोगी पडणार

सोलापूर : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने कालवा व उपसा सिंचन योजनांद्वारे जिल्ह्यातील तलाव, खोलीकरण केलेले ओढे, बंधारे भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कालवा व दोन्ही नद्यांना पाणी सोडण्यात आले असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘लोकमत’ बोलताना सांगितले. 

पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. यामुळे उजनी धरण सोमवारी सायंकाळी ७५ टक्के भरले असून वरुन पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. यामुळे उजनीचे दरवाजे उघडून भीमा नदीला पाणी सोडले आहे. याशिवाय कालवा व भीमा-सीना बोगद्यालाही पाणी सोडण्यात आले आहे. बोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीकाठच्या शेतीसाठी उपयोगी पडणार आहे कारण जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने पाण्याची गरज आहे. सीना नदीवरील बार्शी व शिरापूर या उपसा सिंचन योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बार्शी व उत्तर तालुक्यातील योजनेच्या कार्यक्षेत्रातील तलावात पाणी सोडण्यास मदत होणार आहे.

कालव्यातून सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोलापूर शहरापर्यंत येणार आहे. धरणापासून सोलापूरपर्यंत कालव्यालगतच्या ओढ्यांना, ओढ्यावरील बंधाºयांना व तलावात पाणी सोडता येणार आहे.  तसे आदेश असल्याचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.  ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येणार आहे त्या-त्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठीच्या सूचना आम्ही कर्मचाºयांना दिल्या असल्याचे साळे यांनी सांगितले. 

त्या अन् याही वर्षी सारखीच स्थिती..- २०१३ मध्ये अशाच पद्धतीने पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत होते.  त्यावर्षीही जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने उजनी धरण कालवा क्षेत्राखालील तलाव, ओढे, नाले, बंधारे पाण्याने भरुन घेतले होते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाण्याचे नियोजन केल्याने अनेक कोरडे तलाव पाण्याचे भरुन निघाले होते. ही परिस्थिती याही वर्षी निर्माण झाली असून उजनीमुळे मागील वर्षीही जेमतेम तलाव भरले होते.  

- सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली असून मंगळवारी दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजनाही सुरू केल्या जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी सांगितले. 

उजनीत पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग पाहता कालवा क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येईल त्या-त्या ठिकाणी पाणी साठवले जाईल.  तसे नियोजन केले असून किमान महिनाभर कालवा व बोगद्याला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकºयांनीही पाणी साठविण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावेत.- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक