शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
7
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
8
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
9
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
10
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
13
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
14
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
15
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
16
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
17
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
18
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
19
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
20
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि ...

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि डिजिटल वापराच्या बाबतीत आम्ही भारतीय जागतिकस्तरावर वरच्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच भारतासह वैश्विक शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली का, हा प्रश्नच आहे; परंतु वास्तविकता तसे नाही. खरे पाहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोने जाहीर केल्यानुसार सन १९६६ पासून ८ सप्टेंबर हा ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे होय. २०२१ या वर्षासाठी ‘मानवकेंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन संकुचित करणे’ हे घोषवाक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविणे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.

व्यक्तीला समजून लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता होय. भारतासारख्या विकसनशील देशात दारिद्र्य निर्मूलनापासून ते आर्थिक आणि सामाजिक समानतेद्वारे चांगले जीवनमान उपभोगण्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा पाया विस्तारणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक साक्षरता असलेले देश प्रगत, तर सर्वात कमी साक्षरता असणारे देश अप्रगत आहेत.

भारतात, १९५१ मध्ये एकूण १८.३३ टक्के लोक साक्षर होते. त्यापैकी २७.१६ टक्के पुरुष आणि केवळ ८.८६ टक्के स्त्रिया साक्षर होत्या. साक्षरतेच्या बाबतीत सरकारने सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, राजीव गांधी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, मध्यान्न भोजन इत्यादींचा परिणाम म्हणून, २०११ च्या शिरगणतीनुसार एकूण साक्षरता ७४.०४ टक्के असून, पुरुष व स्त्री साक्षरता अनुक्रमे ८२.१४ टक्के व ६५.५ टक्के वाढली. देशात सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यात असून, सर्वात कमी बिहार राज्यात आहे. म्हणजेच, स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही आपण अद्यापही १०० टक्के साक्षरता साध्य करू शकलो नाही हेच वास्तव.

आधुनिक जीवनशैलीचा विचार करता केवळ अक्षर साक्षरता महत्त्वाची नाही, तर सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ‘आरोग्य साक्षरता’ किती महत्त्वाची आहे, ही बाब भारतासह जगातील सर्वच देशात अधोरेखित झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘सेबी’ आर्थिक अर्थात गुंतवणूक साक्षरता या विषयावर देशभर कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे लोकांना अर्थ साक्षरतेविषयी जागरूक करत आहे. आज संपूर्ण मानवजातीला ‘मानवी मूल्य’ आणि ‘वर्तणूक साक्षर’तेची नितांत गरज असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

एकंदरीत, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कायमस्वरूपी रामबाण औषध म्हणून साक्षरतेच्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिल्यास ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजात ‘निरक्षरता’ या शापातून मुक्त होईल.

- डॉ. राजाराम पाटील, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर

-----