शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि ...

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि डिजिटल वापराच्या बाबतीत आम्ही भारतीय जागतिकस्तरावर वरच्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच भारतासह वैश्विक शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली का, हा प्रश्नच आहे; परंतु वास्तविकता तसे नाही. खरे पाहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोने जाहीर केल्यानुसार सन १९६६ पासून ८ सप्टेंबर हा ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे होय. २०२१ या वर्षासाठी ‘मानवकेंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन संकुचित करणे’ हे घोषवाक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविणे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.

व्यक्तीला समजून लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता होय. भारतासारख्या विकसनशील देशात दारिद्र्य निर्मूलनापासून ते आर्थिक आणि सामाजिक समानतेद्वारे चांगले जीवनमान उपभोगण्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा पाया विस्तारणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक साक्षरता असलेले देश प्रगत, तर सर्वात कमी साक्षरता असणारे देश अप्रगत आहेत.

भारतात, १९५१ मध्ये एकूण १८.३३ टक्के लोक साक्षर होते. त्यापैकी २७.१६ टक्के पुरुष आणि केवळ ८.८६ टक्के स्त्रिया साक्षर होत्या. साक्षरतेच्या बाबतीत सरकारने सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, राजीव गांधी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, मध्यान्न भोजन इत्यादींचा परिणाम म्हणून, २०११ च्या शिरगणतीनुसार एकूण साक्षरता ७४.०४ टक्के असून, पुरुष व स्त्री साक्षरता अनुक्रमे ८२.१४ टक्के व ६५.५ टक्के वाढली. देशात सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यात असून, सर्वात कमी बिहार राज्यात आहे. म्हणजेच, स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही आपण अद्यापही १०० टक्के साक्षरता साध्य करू शकलो नाही हेच वास्तव.

आधुनिक जीवनशैलीचा विचार करता केवळ अक्षर साक्षरता महत्त्वाची नाही, तर सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ‘आरोग्य साक्षरता’ किती महत्त्वाची आहे, ही बाब भारतासह जगातील सर्वच देशात अधोरेखित झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘सेबी’ आर्थिक अर्थात गुंतवणूक साक्षरता या विषयावर देशभर कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे लोकांना अर्थ साक्षरतेविषयी जागरूक करत आहे. आज संपूर्ण मानवजातीला ‘मानवी मूल्य’ आणि ‘वर्तणूक साक्षर’तेची नितांत गरज असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

एकंदरीत, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कायमस्वरूपी रामबाण औषध म्हणून साक्षरतेच्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिल्यास ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजात ‘निरक्षरता’ या शापातून मुक्त होईल.

- डॉ. राजाराम पाटील, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर

-----