शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि ...

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि डिजिटल वापराच्या बाबतीत आम्ही भारतीय जागतिकस्तरावर वरच्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच भारतासह वैश्विक शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली का, हा प्रश्नच आहे; परंतु वास्तविकता तसे नाही. खरे पाहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोने जाहीर केल्यानुसार सन १९६६ पासून ८ सप्टेंबर हा ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे होय. २०२१ या वर्षासाठी ‘मानवकेंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन संकुचित करणे’ हे घोषवाक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविणे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.

व्यक्तीला समजून लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता होय. भारतासारख्या विकसनशील देशात दारिद्र्य निर्मूलनापासून ते आर्थिक आणि सामाजिक समानतेद्वारे चांगले जीवनमान उपभोगण्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा पाया विस्तारणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक साक्षरता असलेले देश प्रगत, तर सर्वात कमी साक्षरता असणारे देश अप्रगत आहेत.

भारतात, १९५१ मध्ये एकूण १८.३३ टक्के लोक साक्षर होते. त्यापैकी २७.१६ टक्के पुरुष आणि केवळ ८.८६ टक्के स्त्रिया साक्षर होत्या. साक्षरतेच्या बाबतीत सरकारने सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, राजीव गांधी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, मध्यान्न भोजन इत्यादींचा परिणाम म्हणून, २०११ च्या शिरगणतीनुसार एकूण साक्षरता ७४.०४ टक्के असून, पुरुष व स्त्री साक्षरता अनुक्रमे ८२.१४ टक्के व ६५.५ टक्के वाढली. देशात सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यात असून, सर्वात कमी बिहार राज्यात आहे. म्हणजेच, स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही आपण अद्यापही १०० टक्के साक्षरता साध्य करू शकलो नाही हेच वास्तव.

आधुनिक जीवनशैलीचा विचार करता केवळ अक्षर साक्षरता महत्त्वाची नाही, तर सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ‘आरोग्य साक्षरता’ किती महत्त्वाची आहे, ही बाब भारतासह जगातील सर्वच देशात अधोरेखित झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘सेबी’ आर्थिक अर्थात गुंतवणूक साक्षरता या विषयावर देशभर कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे लोकांना अर्थ साक्षरतेविषयी जागरूक करत आहे. आज संपूर्ण मानवजातीला ‘मानवी मूल्य’ आणि ‘वर्तणूक साक्षर’तेची नितांत गरज असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

एकंदरीत, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कायमस्वरूपी रामबाण औषध म्हणून साक्षरतेच्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिल्यास ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजात ‘निरक्षरता’ या शापातून मुक्त होईल.

- डॉ. राजाराम पाटील, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर

-----