शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि ...

सध्याच्या भौतिक सुखसुविधांमुळे मानव नवप्रवर्तनवादी बनत चालला असून, विविध क्षेत्रातील संशोधनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. सध्याच्या ऑनलाइन आणि डिजिटल वापराच्या बाबतीत आम्ही भारतीय जागतिकस्तरावर वरच्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच भारतासह वैश्विक शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, साक्षरतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली का, हा प्रश्नच आहे; परंतु वास्तविकता तसे नाही. खरे पाहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोने जाहीर केल्यानुसार सन १९६६ पासून ८ सप्टेंबर हा ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे होय. २०२१ या वर्षासाठी ‘मानवकेंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन संकुचित करणे’ हे घोषवाक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविणे हा या घोषवाक्याचा उद्देश आहे.

व्यक्तीला समजून लिहिता-वाचता येणे म्हणजे साक्षरता होय. भारतासारख्या विकसनशील देशात दारिद्र्य निर्मूलनापासून ते आर्थिक आणि सामाजिक समानतेद्वारे चांगले जीवनमान उपभोगण्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा पाया विस्तारणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक साक्षरता असलेले देश प्रगत, तर सर्वात कमी साक्षरता असणारे देश अप्रगत आहेत.

भारतात, १९५१ मध्ये एकूण १८.३३ टक्के लोक साक्षर होते. त्यापैकी २७.१६ टक्के पुरुष आणि केवळ ८.८६ टक्के स्त्रिया साक्षर होत्या. साक्षरतेच्या बाबतीत सरकारने सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, राजीव गांधी साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, मध्यान्न भोजन इत्यादींचा परिणाम म्हणून, २०११ च्या शिरगणतीनुसार एकूण साक्षरता ७४.०४ टक्के असून, पुरुष व स्त्री साक्षरता अनुक्रमे ८२.१४ टक्के व ६५.५ टक्के वाढली. देशात सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यात असून, सर्वात कमी बिहार राज्यात आहे. म्हणजेच, स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही आपण अद्यापही १०० टक्के साक्षरता साध्य करू शकलो नाही हेच वास्तव.

आधुनिक जीवनशैलीचा विचार करता केवळ अक्षर साक्षरता महत्त्वाची नाही, तर सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ‘आरोग्य साक्षरता’ किती महत्त्वाची आहे, ही बाब भारतासह जगातील सर्वच देशात अधोरेखित झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘सेबी’ आर्थिक अर्थात गुंतवणूक साक्षरता या विषयावर देशभर कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे लोकांना अर्थ साक्षरतेविषयी जागरूक करत आहे. आज संपूर्ण मानवजातीला ‘मानवी मूल्य’ आणि ‘वर्तणूक साक्षर’तेची नितांत गरज असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते.

एकंदरीत, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कायमस्वरूपी रामबाण औषध म्हणून साक्षरतेच्या कार्यक्रमांना अग्रक्रम दिल्यास ज्ञानाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण मानवजात ‘निरक्षरता’ या शापातून मुक्त होईल.

- डॉ. राजाराम पाटील, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर

-----