शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नातलगांनी नाकारले, पोलिसांनी फटकारले, तेव्हा कुठे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 13:26 IST

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती : बेवारस प्रेतांना मनपा, सामाजिक संघटना देतात अग्नी

सोलापूर : कोरोनामुळे मरण पावलेल्या काही रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रक्ताचे नातलग तयार नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे शवागृहात पाच ते दहा दिवस मृतदेह पडून असतात. या नातलगांना पोलिसांमार्फत तंबी देऊन बोलावले जात आहे.

अनेक नातलग गंभीर आजारी रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. एक-दोन दिवस औषधोपचारासाठी पैसे देऊन गायब होतात. मृत्यूची खबर दिल्यानंतर हे नातेवाईक येत नाहीत. महापालिकेने कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी टायगर ग्रूप या संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेचे केतन देवी म्हणाले, लोकांमध्ये कोरोनाबद्दल मोठी भीती आहे. आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात दोन हजारहून अधिक मृतांवर अंत्यसंस्कार केले. गेल्या वर्षी ज्या मृतांचे नातेवाईक आले नाहीत त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी राजू डोलारे आणि आमचे कार्यकर्ते अंत्यसंस्कार करायचे. मात्र यातून वाद नको म्हणून काहीही करुन नातेवाइकांना बोलाविण्याचा निर्णय घेतला.

काही नातेवाईक कोरोनाच्या भीतीमुळे येत नाहीत. त्यांना ग्रामसेवक, तलाठी आणि जवळच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून निरोप दिला जातो. हे नातेवाईक आले की त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यांना मृतांचा चेहरा दाखविला जातो. पोलिसांना खबर गेली की अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या सहा महिन्यात ५० हून अधिक लोकांसाठी ही पध्दत अवलंबली असल्याचे देवी म्हणाले.

जिसका कोई नही उसका...

एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत एकूण २० बेवारस लोकांचा मृत्यू झाला. या सर्व व्यक्तींवर महापालिकेचे मोदी स्मशानभूमीतील कर्मचारी राजू डोलारे यांनीच अंत्यसंस्कार केले. या व्यक्तींचे मृतदेह टायगर ग्रूपनेच त्यांच्याकडे सोपविले. वर्षभरात १२० हून अधिक मृतांचे नातेवाईक आलेच नाहीत. त्यांच्यावर राजू डोलारे, टायगर ग्रूपचे सदस्य, लादेन शेख आणि सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

  • गेेेेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू - २०७१०
  • मनपा, टायगर ग्रुप, लादेन शेख यांनी केलेले अंत्यसंस्कार १२०

 

वाद टाळण्याचा प्रयत्न

कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास पीपीई किट घालून पाच जणांना अंत्यसंस्कारला परवानगी दिली जाते. अनेक मृतांचे केवळ एक किंवा दोन नातेवाईक अंत्यसंस्काराला हजर असतात. काहीवेळा गर्दीही होते. भावनेचा विषय असतो. काही बोललो तर वाद होतात. परंतु, लोक २० ते २५ मिनिटांसाठी स्मशानभूमीत असतात. त्यामुळे वाद घालत नसल्याचे पालिकेचे कर्मचारी सांगतात.

कोरोनाबद्दल लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच कदाचित नातेवाईक येत नसतील. ज्यांचे नातेवाईक येत नाहीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

- राजू डोलारे, मनपा कर्मचारी, मोदी स्मशानभूमी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू