शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

सात तालुक्यांत पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. ...

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबरपर्यंत ५०७ मि.मी. म्हणजे १०५.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५५८ मि.मी. म्हणजे १२२ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३७ मि.मी. म्हणजे ११५.४ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि. मी. अपेक्षित असताना ६३८ मि.मी. म्हणजे १२०.७ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि. मी. अपेक्षित असताना ५८६ मि. मी. म्हणजे १०९.३ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४८६ मि. मी. म्हणजे ११२ टक्के, अक्कलकोट ५४३.४ मि.मी. ऐवजी ५५२ म्हणजे १०१ टक्के, तर सांगोला तालुक्यात ४६८ मि.मी. म्हणजे १०० टक्के पाऊस पडला आहे.

पंढरपूर तालुक्यात ९६.६ टक्के, माढा तालुक्यात ९६.६ टक्के, करमाळा तालुक्यात ८८.६ टक्के, तर माळशिरस तालुक्यात ८७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चौकट

२५ तलाव ओसंडून वाहू लागले

जिल्ह्यातील चार बोरी, हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव, तर २१ लघू होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, कारी, शेळगाव, चारे, कळंबवाडी, तावडी, जवळगाव, वैराग, काझीकणबस व बीबीदारफळ हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, घोळसगाव या तलावांत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर तलावात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.....................

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख-हिप्परगा मध्यम प्रकल्पात ७७.३२ टक्के (१.६७ टी.एम.सी.) पाणी आले आहे. मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के, तर हिंगणी, जवळगाव, बोरी व ढाळेपिंपळगाव हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

................

सात मध्यम तलावात १८१.४९ द.ल.घ.मी. म्हणजे ६.४१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

५६ लघू तलावांत ६२.२७ दलघमी म्हणजे ४६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.................

जून महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस वगळता एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. पिकात पाणी आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत तातडीने द्यावी.

- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना.