शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

सात तालुक्यांत पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. ...

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबरपर्यंत ५०७ मि.मी. म्हणजे १०५.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५५८ मि.मी. म्हणजे १२२ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३७ मि.मी. म्हणजे ११५.४ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि. मी. अपेक्षित असताना ६३८ मि.मी. म्हणजे १२०.७ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि. मी. अपेक्षित असताना ५८६ मि. मी. म्हणजे १०९.३ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४८६ मि. मी. म्हणजे ११२ टक्के, अक्कलकोट ५४३.४ मि.मी. ऐवजी ५५२ म्हणजे १०१ टक्के, तर सांगोला तालुक्यात ४६८ मि.मी. म्हणजे १०० टक्के पाऊस पडला आहे.

पंढरपूर तालुक्यात ९६.६ टक्के, माढा तालुक्यात ९६.६ टक्के, करमाळा तालुक्यात ८८.६ टक्के, तर माळशिरस तालुक्यात ८७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चौकट

२५ तलाव ओसंडून वाहू लागले

जिल्ह्यातील चार बोरी, हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव, तर २१ लघू होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, कारी, शेळगाव, चारे, कळंबवाडी, तावडी, जवळगाव, वैराग, काझीकणबस व बीबीदारफळ हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, घोळसगाव या तलावांत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर तलावात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.....................

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख-हिप्परगा मध्यम प्रकल्पात ७७.३२ टक्के (१.६७ टी.एम.सी.) पाणी आले आहे. मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के, तर हिंगणी, जवळगाव, बोरी व ढाळेपिंपळगाव हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

................

सात मध्यम तलावात १८१.४९ द.ल.घ.मी. म्हणजे ६.४१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

५६ लघू तलावांत ६२.२७ दलघमी म्हणजे ४६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.................

जून महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस वगळता एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. पिकात पाणी आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत तातडीने द्यावी.

- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना.