शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

सात तालुक्यांत पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. ...

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबरपर्यंत ५०७ मि.मी. म्हणजे १०५.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५५८ मि.मी. म्हणजे १२२ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३७ मि.मी. म्हणजे ११५.४ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि. मी. अपेक्षित असताना ६३८ मि.मी. म्हणजे १२०.७ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि. मी. अपेक्षित असताना ५८६ मि. मी. म्हणजे १०९.३ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४८६ मि. मी. म्हणजे ११२ टक्के, अक्कलकोट ५४३.४ मि.मी. ऐवजी ५५२ म्हणजे १०१ टक्के, तर सांगोला तालुक्यात ४६८ मि.मी. म्हणजे १०० टक्के पाऊस पडला आहे.

पंढरपूर तालुक्यात ९६.६ टक्के, माढा तालुक्यात ९६.६ टक्के, करमाळा तालुक्यात ८८.६ टक्के, तर माळशिरस तालुक्यात ८७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चौकट

२५ तलाव ओसंडून वाहू लागले

जिल्ह्यातील चार बोरी, हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव, तर २१ लघू होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, कारी, शेळगाव, चारे, कळंबवाडी, तावडी, जवळगाव, वैराग, काझीकणबस व बीबीदारफळ हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, घोळसगाव या तलावांत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर तलावात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.....................

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख-हिप्परगा मध्यम प्रकल्पात ७७.३२ टक्के (१.६७ टी.एम.सी.) पाणी आले आहे. मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के, तर हिंगणी, जवळगाव, बोरी व ढाळेपिंपळगाव हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

................

सात मध्यम तलावात १८१.४९ द.ल.घ.मी. म्हणजे ६.४१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

५६ लघू तलावांत ६२.२७ दलघमी म्हणजे ४६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.................

जून महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस वगळता एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. पिकात पाणी आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत तातडीने द्यावी.

- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना.