शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

सात तालुक्यांत पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. ...

जिल्ह्यात एकूण १०५.४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबरपर्यंत ५०७ मि.मी. म्हणजे १०५.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५५८ मि.मी. म्हणजे १२२ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६३७ मि.मी. म्हणजे ११५.४ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि. मी. अपेक्षित असताना ६३८ मि.मी. म्हणजे १२०.७ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि. मी. अपेक्षित असताना ५८६ मि. मी. म्हणजे १०९.३ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४८६ मि. मी. म्हणजे ११२ टक्के, अक्कलकोट ५४३.४ मि.मी. ऐवजी ५५२ म्हणजे १०१ टक्के, तर सांगोला तालुक्यात ४६८ मि.मी. म्हणजे १०० टक्के पाऊस पडला आहे.

पंढरपूर तालुक्यात ९६.६ टक्के, माढा तालुक्यात ९६.६ टक्के, करमाळा तालुक्यात ८८.६ टक्के, तर माळशिरस तालुक्यात ८७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चौकट

२५ तलाव ओसंडून वाहू लागले

जिल्ह्यातील चार बोरी, हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव, तर २१ लघू होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, कारी, शेळगाव, चारे, कळंबवाडी, तावडी, जवळगाव, वैराग, काझीकणबस व बीबीदारफळ हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, घोळसगाव या तलावांत ७० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर तलावात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.....................

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख-हिप्परगा मध्यम प्रकल्पात ७७.३२ टक्के (१.६७ टी.एम.सी.) पाणी आले आहे. मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के, तर हिंगणी, जवळगाव, बोरी व ढाळेपिंपळगाव हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

................

सात मध्यम तलावात १८१.४९ द.ल.घ.मी. म्हणजे ६.४१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

५६ लघू तलावांत ६२.२७ दलघमी म्हणजे ४६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

.................

जून महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस वगळता एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. पिकात पाणी आहे. शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत तातडीने द्यावी.

- अमोल पाटील, जिल्हाध्यक्ष, छावा संघटना.