शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

रेल्वे अपघातातील बेवारस मृतांवर रेल्वे पोलीसच करतात अंत्यसंस्कार

By appasaheb.patil | Updated: February 6, 2021 11:49 IST

वर्षभरात रेल्वेच्या २३४ अपघातात झाला २२१ जणांचा मृत्यू; लोहमार्ग पोलीसच करतात बेवारसांवर अंत्यसंस्कार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात रेल्वेच्या झालेल्या २३४ अपघातात २२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अपघातातील बेवारस मृतांना शोधण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल, प्रिंट अन् ऑनलाइन मीडियाचा आधार घेत आहेत. एवढे करूनही नातेवाईक न आलेल्या मृतांवर रेल्वे पोलीस महापालिका अथवा संबंधित नगरपालिकेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.

देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोक रेल्वेचा आधार घेत आहेत. मागील काही वर्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेत चढताना अथवा रूळावरून डबे घसरल्याने झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातानंतर काही प्रवाशांची ओळख पटते तर काही प्रवाशांची ओळख लवकर पटत नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस संबंधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या प्रतीक्षेसाठी चार ते पाच दिवस ते मृत शरीर शवागारात ठेवले जाते. मात्र पाच दिवसानंतरही त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक न आल्यास संबंधित मृतांवर महापालिका, नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने रेल्वेचे लोहमार्ग पोलीसच अंत्यसंस्कार करीत असल्याचे सांगण्यात आले.

-----------

मागील वर्षातील अहवाल

  • जानेवारी - २६ - १
  • फेब्रुवारी - २९ - ५
  • मार्च - ३० - ५
  • एप्रिल - ०२-००
  • मे - १४ -००
  • जून १५ - १
  • जुलै - ११ -००
  • ऑगस्ट - ११ -००
  • सप्टेंबर - १८ - २
  • ऑक्टोबर १६ - २
  • नोव्हेंबर - २४ -००
  • डिसेंबर - २६ -१
  • एकूण अपघात - २३४

---------

तिकीट अन् मोबाइलवरून नातेवाईक मिळू लागले

रेल्वेच्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यात अपघातानंतर मृतांची ओळख पटविणे अथवा त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी विविध उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जातात. दरम्यान, रेल्वे तिकीट किंवा त्या मृताजवळ असलेल्या मोबाइलवरून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सोपे होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

 

रेल्वे अपघातानंतर संबंधित मृत व्यक्तीचा नियमाप्रमाणे पंचनामा, शवविच्छेदन केले जाते. बेवारस मृतांवर महापालिका व नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याबाबतची नोंद व अहवाल संबंधित वरिष्ठांना पाठविला जातो. बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार मोठा आधार ठरतो.

- श्रेयस चिंचवाडे,

सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर विभाग,

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसAccidentअपघात