शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातातील बेवारस मृतांवर रेल्वे पोलीसच करतात अंत्यसंस्कार

By appasaheb.patil | Updated: February 6, 2021 11:49 IST

वर्षभरात रेल्वेच्या २३४ अपघातात झाला २२१ जणांचा मृत्यू; लोहमार्ग पोलीसच करतात बेवारसांवर अंत्यसंस्कार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात रेल्वेच्या झालेल्या २३४ अपघातात २२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अपघातातील बेवारस मृतांना शोधण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल, प्रिंट अन् ऑनलाइन मीडियाचा आधार घेत आहेत. एवढे करूनही नातेवाईक न आलेल्या मृतांवर रेल्वे पोलीस महापालिका अथवा संबंधित नगरपालिकेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.

देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोक रेल्वेचा आधार घेत आहेत. मागील काही वर्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेत चढताना अथवा रूळावरून डबे घसरल्याने झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातानंतर काही प्रवाशांची ओळख पटते तर काही प्रवाशांची ओळख लवकर पटत नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस संबंधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या प्रतीक्षेसाठी चार ते पाच दिवस ते मृत शरीर शवागारात ठेवले जाते. मात्र पाच दिवसानंतरही त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक न आल्यास संबंधित मृतांवर महापालिका, नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने रेल्वेचे लोहमार्ग पोलीसच अंत्यसंस्कार करीत असल्याचे सांगण्यात आले.

-----------

मागील वर्षातील अहवाल

  • जानेवारी - २६ - १
  • फेब्रुवारी - २९ - ५
  • मार्च - ३० - ५
  • एप्रिल - ०२-००
  • मे - १४ -००
  • जून १५ - १
  • जुलै - ११ -००
  • ऑगस्ट - ११ -००
  • सप्टेंबर - १८ - २
  • ऑक्टोबर १६ - २
  • नोव्हेंबर - २४ -००
  • डिसेंबर - २६ -१
  • एकूण अपघात - २३४

---------

तिकीट अन् मोबाइलवरून नातेवाईक मिळू लागले

रेल्वेच्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यात अपघातानंतर मृतांची ओळख पटविणे अथवा त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी विविध उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जातात. दरम्यान, रेल्वे तिकीट किंवा त्या मृताजवळ असलेल्या मोबाइलवरून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सोपे होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

 

रेल्वे अपघातानंतर संबंधित मृत व्यक्तीचा नियमाप्रमाणे पंचनामा, शवविच्छेदन केले जाते. बेवारस मृतांवर महापालिका व नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याबाबतची नोंद व अहवाल संबंधित वरिष्ठांना पाठविला जातो. बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार मोठा आधार ठरतो.

- श्रेयस चिंचवाडे,

सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर विभाग,

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसAccidentअपघात