शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वे अपघातातील बेवारस मृतांवर रेल्वे पोलीसच करतात अंत्यसंस्कार

By appasaheb.patil | Updated: February 6, 2021 11:49 IST

वर्षभरात रेल्वेच्या २३४ अपघातात झाला २२१ जणांचा मृत्यू; लोहमार्ग पोलीसच करतात बेवारसांवर अंत्यसंस्कार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात रेल्वेच्या झालेल्या २३४ अपघातात २२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अपघातातील बेवारस मृतांना शोधण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल, प्रिंट अन् ऑनलाइन मीडियाचा आधार घेत आहेत. एवढे करूनही नातेवाईक न आलेल्या मृतांवर रेल्वे पोलीस महापालिका अथवा संबंधित नगरपालिकेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.

देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोक रेल्वेचा आधार घेत आहेत. मागील काही वर्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेत चढताना अथवा रूळावरून डबे घसरल्याने झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातानंतर काही प्रवाशांची ओळख पटते तर काही प्रवाशांची ओळख लवकर पटत नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस संबंधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या प्रतीक्षेसाठी चार ते पाच दिवस ते मृत शरीर शवागारात ठेवले जाते. मात्र पाच दिवसानंतरही त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक न आल्यास संबंधित मृतांवर महापालिका, नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने रेल्वेचे लोहमार्ग पोलीसच अंत्यसंस्कार करीत असल्याचे सांगण्यात आले.

-----------

मागील वर्षातील अहवाल

  • जानेवारी - २६ - १
  • फेब्रुवारी - २९ - ५
  • मार्च - ३० - ५
  • एप्रिल - ०२-००
  • मे - १४ -००
  • जून १५ - १
  • जुलै - ११ -००
  • ऑगस्ट - ११ -००
  • सप्टेंबर - १८ - २
  • ऑक्टोबर १६ - २
  • नोव्हेंबर - २४ -००
  • डिसेंबर - २६ -१
  • एकूण अपघात - २३४

---------

तिकीट अन् मोबाइलवरून नातेवाईक मिळू लागले

रेल्वेच्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यात अपघातानंतर मृतांची ओळख पटविणे अथवा त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी विविध उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जातात. दरम्यान, रेल्वे तिकीट किंवा त्या मृताजवळ असलेल्या मोबाइलवरून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सोपे होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

 

रेल्वे अपघातानंतर संबंधित मृत व्यक्तीचा नियमाप्रमाणे पंचनामा, शवविच्छेदन केले जाते. बेवारस मृतांवर महापालिका व नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याबाबतची नोंद व अहवाल संबंधित वरिष्ठांना पाठविला जातो. बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार मोठा आधार ठरतो.

- श्रेयस चिंचवाडे,

सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर विभाग,

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसAccidentअपघात