शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 10:48 IST

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

ठळक मुद्देसर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा - डॉ. पद्मसिंह पाटील  सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ -डॉ. पद्मसिंह पाटील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले - डॉ. पद्मसिंह पाटील

बार्शी : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले आहेत. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पदाधिकाºयांनी बार्शी येथे घेतलेल्या सभेतून केला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या  शंभर चुका झाल्या आहेत. राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, क्लिष्ट करुन टाकलेली जीएसटी, सर्वसामान्यांचा अंत पाहणारी नोटबंदी, फसवी कर्जमाफी, पीकविम्याच्या बाबतीत कंपनी धार्जिणे धोरण, इंधन, गॅसचे  गगनाला भिडलेले दर, या बाबी सरकारचा भ्रष्ट व अपयशी कारभार स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत, सर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा, असे आवाहन त्यांनी मतदारांनी केले.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, शहर उपाध्यक्ष, निलेश मांजरे पाटील, इस्माईल पठाण, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष सचिन तूपसमिंदर, बार्शी शहर महिला अध्यक्षा सुमन महाजन, महिला संघटक अ‍ॅड. निवेदिता आरगडे तालुका सेवा दल अध्यक्षा शीलाताई हिंगे, महिला सेवा दल शहर अध्यक्षा सुनीता गायकवाड, विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी शहर अध्यक्ष केशव मुकटे, प्रवक्ते प्रा. पंकज पवार, जहिर बागवान, ईश्वर व्हनकळस उपस्थित होते.

भावनिक बोलून विकास होत नाही : पद्मसिंह पाटील- महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, केवळ भावनिक बोलून, घराणेशाहीवर विकास होत नसतो़ आम्ही नैसर्गिक संकटांना तोंड देवून पाटबंधाºयाचे अनेक प्रकल्प निर्मिले़ तेरणाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणली़ आज त्याचे वाटोळे कोणी केले, हे उस्मानाबादच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरosmanabad-pcउस्मानाबादcongressकाँग्रेसBJPभाजपाRafale Dealराफेल डीलNote Banनोटाबंदी