शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 10:48 IST

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

ठळक मुद्देसर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा - डॉ. पद्मसिंह पाटील  सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ -डॉ. पद्मसिंह पाटील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले - डॉ. पद्मसिंह पाटील

बार्शी : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले आहेत. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पदाधिकाºयांनी बार्शी येथे घेतलेल्या सभेतून केला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या  शंभर चुका झाल्या आहेत. राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, क्लिष्ट करुन टाकलेली जीएसटी, सर्वसामान्यांचा अंत पाहणारी नोटबंदी, फसवी कर्जमाफी, पीकविम्याच्या बाबतीत कंपनी धार्जिणे धोरण, इंधन, गॅसचे  गगनाला भिडलेले दर, या बाबी सरकारचा भ्रष्ट व अपयशी कारभार स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत, सर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा, असे आवाहन त्यांनी मतदारांनी केले.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, शहर उपाध्यक्ष, निलेश मांजरे पाटील, इस्माईल पठाण, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष सचिन तूपसमिंदर, बार्शी शहर महिला अध्यक्षा सुमन महाजन, महिला संघटक अ‍ॅड. निवेदिता आरगडे तालुका सेवा दल अध्यक्षा शीलाताई हिंगे, महिला सेवा दल शहर अध्यक्षा सुनीता गायकवाड, विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी शहर अध्यक्ष केशव मुकटे, प्रवक्ते प्रा. पंकज पवार, जहिर बागवान, ईश्वर व्हनकळस उपस्थित होते.

भावनिक बोलून विकास होत नाही : पद्मसिंह पाटील- महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, केवळ भावनिक बोलून, घराणेशाहीवर विकास होत नसतो़ आम्ही नैसर्गिक संकटांना तोंड देवून पाटबंधाºयाचे अनेक प्रकल्प निर्मिले़ तेरणाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणली़ आज त्याचे वाटोळे कोणी केले, हे उस्मानाबादच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरosmanabad-pcउस्मानाबादcongressकाँग्रेसBJPभाजपाRafale Dealराफेल डीलNote Banनोटाबंदी