शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

सोलापूरकरांच्या हाती पुण्याच्या रिक्षांचं हॅन्डल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:01 IST

जगण्यासाठी सोलापूर सोडले : सोलापुरी रिक्षाचालकांची छाप

ठळक मुद्दे आॅटो रिक्षा रोजच्या रोजीरोटीचा एक भाग म्हणून समोर येऊ पाहत आहेसोलापूरचे रिक्षावाले काका आता पुण्यात रिक्षा अंकल म्हणून ओळखू लागले़रोजगार वाढला तरच पुण्यात येणारा सोलापूरकरांचा लोंढा कमी होणार

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : आॅटो रिक्षा आज वाहनप्रकार वाहन उद्योगाचा आणि अनेक भारतीयांचा एक अविभाज्य भाग आहे. काही लोकांकरिता एक प्रवासाचे साधन म्हणून तर काहींसाठी रोजच्या रोजीरोटीचा एक भाग म्हणून समोर येऊ पाहत आहे

सोलापूर शहरातील मर्यादित कार्यक्षेत्र, केवळ २० ते २५ किलोमीटरपर्यंतचे अंतऱ़़ कुठेही बसा़... कुठेही उतरा फक्त २० रुपयेच हातात.. शिवाय पोलिसांची कटकट़.. त्यातूनच रिक्षामध्ये विद्यार्थी वाहतूक सुरू झाली़... अन् आम्ही रिक्षावाल्याचे काका झालो... मात्र दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा त्रास काही केल्या कमी होईना. त्यामुळे जास्तीच्या कमाईसाठी पुणे गाठलं... तेथेही विद्यार्थी वाहतूक सुरू केली अन् सोलापूरचे रिक्षावाले काका आता पुण्यात रिक्षा अंकल म्हणून ओळखू लागले़.

मूळ मोहोळ तालुक्यातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेले रिक्षाचालक प्रदीप गोटे यांनी सांगितले की, पुणे शहर विस्ताराने मोठे आहे़ याठिकाणी आयटी कंपन्यांसोबत रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात असल्याने कामगारांची संख्यादेखील मोठी आहे़ शिवाय पुण्याची लोकसंख्या मोठी असल्याने येथे रिक्षा व्यवसाय जोमात आहे़ सोलापूरपेक्षा पुण्यात इंधनही स्वस्त आहे. सोलापुरात फक्त शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, विडी घरकूल, सात रस्ता एवढ्याच परिसरात रिक्षा व्यवसाय आहे़ शिवाय याही मार्गावर ठरलेल्याप्रमाणे भाडे देण्यास सोलापूरकर टाळाटाळ करतात़

पती-पत्नी विद्यार्थी रिक्षाचालक - तुळशी (ता. माढा) येथील सदाशिव काशिनाथ शिंदे हा पदवीधर तरुण. संस्थेत शिक्षक होता. पण संस्थाचालकांनी वाºयावर सोडल्याने विद्यार्थी रिक्षा व्यवसाय सुरू केला. मुलांची संख्या वाढल्याने पुढे मारुतीची ओमनी कार घेतली. आणखी मुले वाढल्याने टाटा मॅजिक घेतली. पती-पत्नी दोघेही विद्यार्थी वाहतूक करतात. दरमहा ५० हजारांपर्यंत कमाई आहे. यांची एक मुलगी सध्या एमबीबीएस करतेय. पुण्यात घरजागा घेऊन स्थिरस्थावर झालाय. 

कामधंद्याच्या शोधात २००८ साली मी पुण्यातील काळेवाडीत राहण्यास आलो़ सुरुवातीपासूनच रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला़ याठिकाणी रिक्षा व्यवसायाला चांगले दिवस आहेत. त्यामुळे महिन्याकाठी २० ते २५ हजार रुपये उत्पन्न कमवितो़ सोलापूर जिल्ह्यात शेती आहे मात्र पाणी नाही, सातत्याने दुष्काळाशी करावा लागणारा सामना, बेरोजगाराचे प्रमाण, नोकºया नाहीत, यामुळे सोलापुरातील बहुतांश तरुण, युवक पुण्यात स्थायिक झाले आहेत़ रोजगार वाढला तरच पुण्यात येणारा सोलापूरकरांचा लोंढा कमी होणार आहे़- शहाजी लोंढे,रा़ कोंढेज, ता़ करमाळा, जि़ सोलापूर

मी, २००४ साली नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आलो़ सुरुवातीला ड्रायव्हिंगचा व्यवसाय केला़ नंतर २०११ साली स्वत:ची रिक्षा घेऊन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय केला़ आज या व्यवसायाच्या माध्यमातून माझा संसार व्यवस्थित सुरू आहे़ सध्या औंढ येथे राहण्यास आहे़ सोलापुरात बेरोजगाराचे प्रमाण खूप आहे़ येथे राजकीय दबावामुळे मोठमोठे उद्योग येत नाहीत़ ही परिस्थिती बदलली पाहिजे तरच पुणेरी सोलापूरकर पुन्हा सोलापुरात येतील, नाहीतर परिस्थिती आहे तशीच राहील़- शिवाजी बलभीम मस्तुद,रिक्षाचालक, पुणेरी सोलापूरकर

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेauto rickshawऑटो रिक्षाbusinessव्यवसाय