शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:18 IST

कोरोना संसर्ग वाढायला केंद्र अन् राज्य दोन्ही सरकार जबाबदार

ठळक मुद्देदेशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार तिजोरी भरण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकरकोरोनाबाधितांची संख्या कमी असताना लॉकडाऊन करणे योग्य राहणार नाही - प्रकाश आंबेडकरसर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार सध्या करीत आहेत - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात ज्या व्यक्तीचा पहिला बळी गेला त्याच्या नातेवाईकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. रोग वाढण्यास देशात केंद्राचे तर महाराष्ट्रात राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरच्या दौºयावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना म्हणाले, चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची माहिती सर्व जगाला झाली होती. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) याबाबत गंभीर इशारा दिला होता. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौºयावर आले होते. वास्तविक  केंद्र सरकारने त्याच वेळेस बाहेरील लोकांना देशात प्रवेश बंदी करणे अपेक्षित होते; पण बाहेरील देशातून लोक भारतामध्ये आल्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग सुरू झाला. हळूहळू या रोगाचा संसर्ग वाढू लागला आणि तो आज संपूर्ण देशांमध्ये पसरला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सध्या लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे देशातील कारखाने, कंपन्या, उद्योग बंद पडले होते. लाखो लोकांच्या हाताचे काम थांबल्यामुळे बेरोजगारीची वेळ निर्माण झाली आहे. आज सर्वसामान्य माणसाला स्वत:चे पोट कसे भरावे हा प्रश्न पडला आहे. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? सध्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे; मात्र त्यानंतर तो संपेल असे नाही. कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी शासनाच्या भरवशावर न राहता आतापासूनच कामाला लागावे असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी सारख्या आजाराप्रमाणे कोरोनासोबत जगण्याचा सल्ला यावेळी दिला. 

लॉकडाऊनमुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार सध्या करीत आहेत असा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, समिउल्ला शेख आदी उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल दरवाढीने तिजोरी भरण्याचा प्रयत्नसध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घसरले आहेत असे सांगितले असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार तिजोरी भरण्याचा प्रयत्न करीत आहे. शासन सध्या सर्वसामान्य जनतेला ब्लॅकमेल करत आहे. 

लॉकडाऊन का ? गेल्यावर्षी २०१९ मध्ये मार्च ते जून दरम्यान २४ लाख ४ हजार टीबीचे पेशंट होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाला नाही; मात्र त्यापेक्षा कोरोनाबाधितांची संख्या कमी असताना लॉकडाऊन करणे योग्य राहणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी