शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:18 IST

कोरोना संसर्ग वाढायला केंद्र अन् राज्य दोन्ही सरकार जबाबदार

ठळक मुद्देदेशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार तिजोरी भरण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकरकोरोनाबाधितांची संख्या कमी असताना लॉकडाऊन करणे योग्य राहणार नाही - प्रकाश आंबेडकरसर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार सध्या करीत आहेत - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात ज्या व्यक्तीचा पहिला बळी गेला त्याच्या नातेवाईकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. रोग वाढण्यास देशात केंद्राचे तर महाराष्ट्रात राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरच्या दौºयावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना म्हणाले, चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची माहिती सर्व जगाला झाली होती. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) याबाबत गंभीर इशारा दिला होता. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौºयावर आले होते. वास्तविक  केंद्र सरकारने त्याच वेळेस बाहेरील लोकांना देशात प्रवेश बंदी करणे अपेक्षित होते; पण बाहेरील देशातून लोक भारतामध्ये आल्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग सुरू झाला. हळूहळू या रोगाचा संसर्ग वाढू लागला आणि तो आज संपूर्ण देशांमध्ये पसरला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सध्या लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे देशातील कारखाने, कंपन्या, उद्योग बंद पडले होते. लाखो लोकांच्या हाताचे काम थांबल्यामुळे बेरोजगारीची वेळ निर्माण झाली आहे. आज सर्वसामान्य माणसाला स्वत:चे पोट कसे भरावे हा प्रश्न पडला आहे. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? सध्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे; मात्र त्यानंतर तो संपेल असे नाही. कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी शासनाच्या भरवशावर न राहता आतापासूनच कामाला लागावे असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी सारख्या आजाराप्रमाणे कोरोनासोबत जगण्याचा सल्ला यावेळी दिला. 

लॉकडाऊनमुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न दोन्ही सरकार सध्या करीत आहेत असा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, समिउल्ला शेख आदी उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल दरवाढीने तिजोरी भरण्याचा प्रयत्नसध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव घसरले आहेत असे सांगितले असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकार तिजोरी भरण्याचा प्रयत्न करीत आहे. शासन सध्या सर्वसामान्य जनतेला ब्लॅकमेल करत आहे. 

लॉकडाऊन का ? गेल्यावर्षी २०१९ मध्ये मार्च ते जून दरम्यान २४ लाख ४ हजार टीबीचे पेशंट होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाला नाही; मात्र त्यापेक्षा कोरोनाबाधितांची संख्या कमी असताना लॉकडाऊन करणे योग्य राहणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी