शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

समांतर पाईपलाईनचा भूसंपादन आराखडा तयार; ३३ गावांतील ६३१ गटाची निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:30 IST

महत्त्वपूर्ण प्रकल्प; अधिसूचना लवकरच जाहीर होणार, हरकती मागवणार

ठळक मुद्दे समांतर जलवाहिनीचा प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्पजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने भूसंपादन आराखडा तयार करायला सांगितला जीवन प्राधिकरणाने स्मार्ट सिटी कंपनीच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी

 राकेश कदमसोलापूर : उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी तात्पुरत्या भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील ३३ गावचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. या भूसंपादनाची अधिसूचना लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भूसंपादन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 स्मार्ट सिटी योजना आणि एनटीपीसीच्या माध्यमातून उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे. हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला आॅगस्ट महिन्यात वर्क आॅर्डर देण्यात आली आहे. महापालिका, पोचमपाड कंपनीने जलवाहिनी, ब्रेक प्रेशर टॅँक व इतर कामांचा तांत्रिक आराखडा तयार केला आहे. तो जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. जुन्या जलवाहिनीच्या बाजूलाच १५ मीटर अंतरावर भूमिगत नवी जलवाहिनी असेल. सोरेगाव, पाकणी येथे नवे पंपगृह होतील. त्यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि पोचमपाड कंपनीच्या अधिकाºयांनी संयुक्त पाहणी करून ३३ गावातील ६३१ गट निश्चित केले आहेत. त्याची अधिसूचना सरकारी प्रेसकडे पाठविण्यात आली आहे. ती लवकरच प्रसिध्द होणार आहे. त्यावर २१ दिवसांत हरकती मागविण्यात येतील. बाधित शेतकºयांना महापालिकेच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

या गावातील जमिनींचे होणार वापर संपादन - माढा - उजनी-टेंभुर्णी २, रांझणी ५, आढेगाव ७, शिराळ टेंभुर्णी १४, टेंभुर्णी ४९, अरण ४५, मोडनिंब २१, वेणेगाव १८, सापटणे-टेंभुर्णी १६, भुर्इंजे ६, अकुंबे ७, वरवडे २८. मोहोळ - शेटफळ २०, तेलंगवाडी २७, खंडाळी ४, देवडी ३६, मोहोळ ४४, लांबोटी १८, चिंचोळी काटी ४, वडाचीवाडी १४, हिवरे १२, चिखली १५, यावली ४३, कोळेगाव १५, सावळेश्वर २०. उत्तर सोलापूर - पाकणी ११, कोंडी ४१, केगाव ९, सलगर वस्ती १८, सोरेगाव ५, शिवाजी नगर ७, देगाव ३०, प्रतापनगर २०.

पाईपलाईनच्या कामासाठी होणारे भूसंपादन हे इतर भूसंपादनापेक्षा वेगळे आहे. महाराष्टÑ अंडरग्राउंड पाईपलाईन्स अँड अंडरग्राउंड डक्टस् (अ‍ॅक्विझिशन आॅफ राइट आॅफ यूजन इन लँड) अ‍ॅक्ट २०१८ अन्वये ही भूसंपादन प्रक्रिया होईल. ६३१ गटांमध्ये १५ मीटर अंतरासाठी जमिनीच्या वापराचे संपादन होईल. मुळातच ही जलवाहिनी जमिनीखाली एक मीटर असेल. जलवाहिनीचे काम झाल्यानंतर शेतकºयांना त्यावर शेती करता येईल. - शैलेश सूर्यवंशीउपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, सोलापूर. 

नुकसानभरपाई...- समांतर जलवाहिनीचा प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने भूसंपादन आराखडा तयार करायला सांगितला होता. त्यानुसार आराखडा तयार केला आहे. जीवन प्राधिकरणाने स्मार्ट सिटी कंपनीच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर भूसंपादनासाठी पुन्हा संयुक्त मोजणी होईल. या मोजणीत बाधित होणारी पिके, मालमत्ता यांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात येईल, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका