शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Maharashtra Election 2019; सोलापुरात येऊन प्रकाश आंबेडकरांनी केली पालकमंत्र्यांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:28 IST

इंदिरा गांधी स्टेडियमवर सभा; उजनीत पाणी असतानाही सोलापूरकरांना ते मिळत नसल्याची व्यक्त केली खंत

ठळक मुद्देसंपूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे - प्रकाश आंबेडकरसध्याचे सरकार हे फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहे - प्रकाश आंबेडकर७० वर्षांपासून सुरु असलेला ट्रॅक काढून त्याजागी नवा ट्रॅक उभा करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर

सोलापूर : सोलापूर शहर मँचेस्टरसारखे होऊ शकले असते. मात्र येथील सत्ताधाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. तसेच शहरात सध्याच्या परिस्थितीतही सोलापूरकरांना रोज एक तास पाणी देता येऊ शकत असताना इथल्या सत्ताधाºयांना हे पाणी सोलापूरकरांना देता आले नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केली.पार्क चौक येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्य कार्यकारिणी सदस्य अमृता अलदर, संतोष पवार, आॅल इंडिया उलेमा बोर्डाचे अध्यक्ष नायब अन्सारी, आनंद चंदनशिवे, इम्तियाज पीरजादे, युवराज राठोड आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, संपूर्ण जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. काही भाग शहरात तर काही भाग जिल्ह्याच्या इतर ठिकाणाहून नियंत्रित करावा लागेल. असे झाले तर येथून होणारे स्थलांतर थांबू शकते. सध्याचे सरकार हे फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहे. ७० वर्षांपासून सुरु असलेला ट्रॅक काढून त्याजागी नवा ट्रॅक उभा करण्याची गरज आहे. सध्या राज्यात ५ टक्के जास्त वीज तयार होत आहे, या जास्तीच्या विजेसाठी वापरले जाणारे पाणी दुष्काळी भागात पोहोचविता येऊ शकते. उजनीच्या धरणातील गाळ काढल्यास या धरणात आणखी पाणी साठवता येऊ शकेल.

भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून २ लाख कंपन्या बंद पडल्या. मोठ्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी छोट्या कंपन्यांचा बळी घेतला. राज्य सरकारने आपल्या डोक्यावरील कर्ज कमी करण्याऐवजी वाढविले. देशातील सर्वांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे जीएसटीवरील भाषण ऐकायला हवे. जीएसटी व नोटाबंदीमुळे देश आर्थिक संकटात कसा सापडला हे कळेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

 सीतारामन यांचे ऐकायचे की, त्यांच्या पतीचे- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने देशाची अर्थव्यवस्था वाईट असून, पंतप्रधान मोदी व सीतारामन यांना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यांची भेट घेऊन अर्थव्यवस्था कशी सुधारायची हे विचारा, असे सांगितले. काही दिवसांनंतर अर्थमंत्री सितारमण यांनी बँका चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. आता प्रश्न असा पडतो की सीतारामन यांचे ऐकायचे की त्यांच्या पतीचे, असा प्रश्न उपस्थित करुन सध्या देशातील बँकांचा एनपीए हा ७२ वरुन ७६ टक्क्यांवर गेला असल्याने देशावरील आर्थिक संकट हे दूर झाले नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक