शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वीज तारांचा स्पार्क; सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:36 IST

दक्षता म्हणून महावितरणकडून सात गावचा वीजपुरवठा खंडित

ठळक मुद्देउन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हालआग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न

सोलापूर  : महावितरणच्या वीज तारांचा स्पार्क झाल्यामुळे महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला मंगळवारी दुपारी एकच्या सुमाराला आग लागली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी सायंकाळपर्यंत ४० फेºया करून पाण्याचा मारा केला. तरीही आग आटोक्यात आली नव्हती. कचरा डेपोच्या परिसरातून विजेच्या अतिउच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. दक्षता म्हणून या भागातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे म्हणाले, कचरा डेपोला दुपारी साडेबारा-एकच्या सुमाराला आग लागली. महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारातून स्पार्क होऊन ठिणग्या कचºयावर पडल्या. कचºयाने पेट घेतला. धुराचे लोट आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या. 

या भागातील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात आला. सायंकाळी सहापर्यंत जवळपास ५ गाड्यांद्वारे ४० फेºया करून पाण्याचा फवारा मारण्यात आला, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. रात्री अंधार आणि धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. वाºयामुळे आग पसरत होती. या धुराचा परिणाम परिसरातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आग आटोक्यात आली तरी धुराचे लोट कमी व्हायला वेळ लागणार आहे. 

जेसीबीच्या सहायाने या ठिकाणी कचरा बाजूला करुन रस्ता करण्यात आला. त्यातून पाण्याच्या गाड्या नेण्यात आल्या. या आगीची झळ कचरा प्रक्रिया प्रकल्पाला बसण्याची शक्यता असून त्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी रात्री या प्रकल्पाच्या बाजूने आग विझविण्यास सुरुवात केली होती, असे केदार आवटे यांनी सांगितले. 

कचºयांमध्ये मिथेन वायू असतो. या वायूमुळे कचरा आणखी पेट घेतो. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण आग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. - त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, मनपा. 

या गावांना बसली झळ - कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्याची झळ विजेच्या तारांना बसू शकते, असा फोन महापालिकेच्या उपायुक्तांनी केला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तत्काळ या भागातील  हगलूर, उळे, कासेगावसह सात गावचा वीजपुरवठा खंडित केला होता, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हाल झाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका