शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

माढ्यातील ३८ गावांत विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:22 AM

कुर्डुवाडी महावितरण उपविभागातील ३८ गावांतून महावितरण कंपनीने थकीत वीजबिलाची केलेली वसुली ही जिल्ह्यात लक्षणीय ठरली. त्यावेळी ज्या ग्राहकांनी दिलेले ...

कुर्डुवाडी महावितरण उपविभागातील ३८ गावांतून महावितरण कंपनीने थकीत वीजबिलाची केलेली वसुली ही जिल्ह्यात लक्षणीय ठरली. त्यावेळी ज्या ग्राहकांनी दिलेले टप्पे किंवा किमान थकबाकी भरली नाही, त्यांचे डीपीदेखील बंद करण्यात आले होते. त्यावेळी महावितरणला सहकार्य म्हणून कुर्डुवाडी, लऊळ, ढवळस, म्हैसगाव, कुर्डू, शिराळ, अंबाड, पडसाळी, अकुलगाव, बारलोणी, रोपळे, भूताष्टे परिसरातील शेतकऱ्यांनी किमान तीन किंवा पाच हजार रुपये कनेक्शननुसार महावितरणच्या पथकाकडे जमा केले. त्यामुळे थकबाकी वसुलीत आघाडी घेतलेल्या या विभागाची जिल्ह्यात चर्चा झाली. परंतु, महावितरण कंपनी वीजपुरवठ्यात मागे पडल्याची खंत शेतकऱ्यांतून व्यक्त झाली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न या परिसराला भेडसावत असताना कमी प्रमाणात वीजपुरवठा होत आहे. आता कमी दाबाने वीजपुरवठा सुरू झाला आहे.

महावितरणने वीजप्रवाह उच्च दाबाने सुरू करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दोन-दोन दिवस वीज न येणे, आली तर कमी दाब असणे, त्यामुळे विद्युत मोटारी यावर चालत नाहीत. ग्राहक या त्रासाला कंटाळले आहेत.

----

१४८ कोटींची थकबाकी वसूल

कुर्डुवाडी उपविभागांतर्गत व्यवसायिक, औद्योगिक, घरगुती, शेतीसह प्रकारात मार्चएन्डपर्यंत १४८ कोटींची थकबाकी ग्राहकांकडे होती. टप्पे टप्पे देऊन महावितरणच्या पथकाने ही थकबाकी वसूल केली. त्यानंतरच खंडित वीजपुरवठ्याचे डीपी जोडण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांची वीज त्यांनी तोडली होती.

.................

सध्या वीजपुरवठा खंडित होतोय ही बाब सत्य आहे. परंतु, याला महावितरणचे कार्यालय जबाबदार नाही. कारण वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून गेल्या काही दिवसांत तांत्रिक कारणामुळे योग्य तो वीजपुरवठा झाला नाही. गुरुवारपासून वीजपुरवठा व्यवस्थित होईल.

- उल्हास कानगुडे,सहायक अभियंता, महावितरण उपविभाग कुर्डुवाडी