शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राजकीय विश्लेषण ; करमाळा बाजार समितीने बागल गटाचे मनोधैर्य वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:56 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ, पाटील, जगताप यांच्यापुढे आत्मचिंतनाचा विषय

ठळक मुद्देआ.पाटील व जगताप युतीच्या मताधिक्यात घटकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाने मुसंडी मारलीबागल गटाचे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य वाढले

नासिर कबीर करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाला १८ हजार ४४५ मते, पाटील-जगताप युतीला १६ हजार २५१ मते आणि शिंदे गटाला १३ हजार ३०५ मते मिळाली़ बागल गटाचे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य वाढले आहे़ तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ झाल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. परिस्थिती पाहता आ.पाटील व माजी आ.जगताप यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

 विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या गेलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील व माजी आ.जयवंतराव जगताप यांची युती झाली होती़ त्यांना मोहिते-पाटील गटाने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्थानिक भाजपाबरोबर काही जागांवर युती करून निवडणूक लढविली होती़ बागल गट स्वबळावर एकाकी निवडणूक मैदानात उतरला होता.

शेतकरी मतदारसंघाच्या १५ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत बागल गटाने जातेगाव गटात पोथरे, रावगाव, वीट, सावडी, राजुरी, हिसरे व कंदर या आठ ठिकाणांच्या गणात आघाडी घेतली़ आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने केम, वांगी, झरे, जिंती, साडे, उमरड या सहा गणात आघाडी घेतली़  संजय शिंदे गटाने वाशिंंबे या एकमेव गणात विजयश्री संपादन केला असला तरी सर्वच गणातून यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व आदिनाथच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात झालेल्या विविध निवडणुकीत गटनिहाय झालेल्या कामगिरीचा आढावा घेता फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने ४२.८० टक्के मते घेत सत्ता संपादन केली होती़ त्यावेळी बागल गटाला ३६.८१ टक्के व शिंदे गटाला १७.१९ टक्के मते मिळाली होती़ त्यानंतर झालेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत चारही गट स्वतंत्रपणे लढले़ बागल गटाने एकहाती सत्ता मिळवत ३३.६४ टक्के मते मिळवली. आ.पाटील गट २६.१२ टक्के , जगताप गट १६.३६ टक्के तर शिंदे गटाने २३.१२ टक्के मते मिळवली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाने मुसंडी मारली आहे.

आ.पाटील व जगताप युतीच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसून येत आहे़ तसेच शिंदे गटाची प्रगती होत चालली आहे. बागल गट ३८ टक्के , आ.पाटील-जगताप युती ३४ टक्के, शिंदे गटाने २५.४० टक्के मते मिळवली आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्टीने आ.पाटील,जगताप, बागल व शिंदे राजकीय वाटचाल करीत आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहर व ३३ गावांतील १ लाख १५ हजार मतदारांचा समावेश असून, हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Patilनारायण पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस