शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राजकीय विश्लेषण ; करमाळा बाजार समितीने बागल गटाचे मनोधैर्य वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:56 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ, पाटील, जगताप यांच्यापुढे आत्मचिंतनाचा विषय

ठळक मुद्देआ.पाटील व जगताप युतीच्या मताधिक्यात घटकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाने मुसंडी मारलीबागल गटाचे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य वाढले

नासिर कबीर करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाला १८ हजार ४४५ मते, पाटील-जगताप युतीला १६ हजार २५१ मते आणि शिंदे गटाला १३ हजार ३०५ मते मिळाली़ बागल गटाचे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य वाढले आहे़ तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ झाल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. परिस्थिती पाहता आ.पाटील व माजी आ.जगताप यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

 विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या गेलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील व माजी आ.जयवंतराव जगताप यांची युती झाली होती़ त्यांना मोहिते-पाटील गटाने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्थानिक भाजपाबरोबर काही जागांवर युती करून निवडणूक लढविली होती़ बागल गट स्वबळावर एकाकी निवडणूक मैदानात उतरला होता.

शेतकरी मतदारसंघाच्या १५ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत बागल गटाने जातेगाव गटात पोथरे, रावगाव, वीट, सावडी, राजुरी, हिसरे व कंदर या आठ ठिकाणांच्या गणात आघाडी घेतली़ आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने केम, वांगी, झरे, जिंती, साडे, उमरड या सहा गणात आघाडी घेतली़  संजय शिंदे गटाने वाशिंंबे या एकमेव गणात विजयश्री संपादन केला असला तरी सर्वच गणातून यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व आदिनाथच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात झालेल्या विविध निवडणुकीत गटनिहाय झालेल्या कामगिरीचा आढावा घेता फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने ४२.८० टक्के मते घेत सत्ता संपादन केली होती़ त्यावेळी बागल गटाला ३६.८१ टक्के व शिंदे गटाला १७.१९ टक्के मते मिळाली होती़ त्यानंतर झालेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत चारही गट स्वतंत्रपणे लढले़ बागल गटाने एकहाती सत्ता मिळवत ३३.६४ टक्के मते मिळवली. आ.पाटील गट २६.१२ टक्के , जगताप गट १६.३६ टक्के तर शिंदे गटाने २३.१२ टक्के मते मिळवली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाने मुसंडी मारली आहे.

आ.पाटील व जगताप युतीच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसून येत आहे़ तसेच शिंदे गटाची प्रगती होत चालली आहे. बागल गट ३८ टक्के , आ.पाटील-जगताप युती ३४ टक्के, शिंदे गटाने २५.४० टक्के मते मिळवली आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्टीने आ.पाटील,जगताप, बागल व शिंदे राजकीय वाटचाल करीत आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहर व ३३ गावांतील १ लाख १५ हजार मतदारांचा समावेश असून, हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Patilनारायण पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस