शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'मतदान कोणालाही करा, मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:20 IST

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर : मी येथे तुमची मते मागायला आलेलो नाही, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मतदान कोठेही करा असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेची सामाजिक बांधिलकी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलो असुन, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शिवसेनेचं नाव घ्या. शिवसेना तुमच्या सेवेसाठी सज्ज राहील, असा आत्मविश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, सेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, शैला स्वामी, जि.प सदस्या शैला गोडसे, पोखरापूर पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, पुष्कराज पाटील आदी उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोहोळ तालुका शिवसेनेच्यावतीने सारोळे येथे धावता दौरा आयोजित केला होता. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबत विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी मला ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळी भागाचा दौरा करुन शिवसेनेच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले.

या भेटीत प्रारंभी पोखरापूर येथील तलावास भेट देऊन परिसरातील पाणी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 1996 सालापासून पोखरापुर तळ्यात पाणी सोडावे या पाण्याच्या मागणीसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. अनेकजण आले गेले, परंतु प्रश्न मार्गी लागला नाही, आपण लक्ष घालावे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. तातडीने हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पंचक्रोशीतील शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मतदान तुम्ही कोणालाही करा, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, याच्याशी काही संबंध नाही. तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोनच दिवसांमध्ये मुंबईत जाऊन जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी काम मार्गी लावण्याचे आश्वासन आदित्य यांनी दिले.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर