शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे बांबू उत्पादने आली धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:44 IST

जागतिक बांबू दिन; मागणी कमी झाली तरी व्यापाºयांनी काळानुसार केले बदल

ठळक मुद्दे१८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बांबू दिन म्हणून साजरा केला जातो़१०० ते १५० जातींचे बांबू पीक भारतात घेतले जाते़ बांबूचे उत्पादन करण्यासाठी मोजक्याच जाती महत्त्वाच्या

रुपेश हेळवे 

सोलापूर : तसे बांबू हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते़ याचबरोबर बांबूला हिरवे सोने म्हणूनही एक वेगळी ओळख आहे़ काही वर्षांपासून बांबूपासून चटई ते सुपापर्यंत अनेक वस्तू बनविल्या जात होत्या, पण या उद्योगात प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे बांबूपासून तयार होणारी सर्व उत्पादने धोक्यात आली आहेत. सर्व वस्तूंची मागणी निम्म्यावर आली आहे़ पण बदलत्या काळानुसार व्यापाºयांनी आपल्यामध्ये बदल करून घेतले आहे़ यामुळे सोलापुरात तयार करण्यात येणाºया बांबूच्या उत्पादनाला राज्यभर मागणी आहे.

१८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बांबू दिन म्हणून साजरा केला जातो़ जगात बांबूच्या पंधराशे जाती आहेत. यातील १०० ते १५० जातींचे बांबू पीक भारतात घेतले जाते़ पण बांबूचे उत्पादन करण्यासाठी मोजक्याच जाती महत्त्वाच्या आहेत.

यामध्ये सोनकाठी, बोरबेट या प्रकारच्या बांबूने विविध वस्तू बनविल्या जातात़ साधारणत: पूर्वी बांबूपासून कुल्फीच्या काड्या, चटई, सूप, टोपली, दुरडी, हात पंखा, झाकण, करंडी, उदबत्तीच्या काड्या आदी वस्तू बनविल्या जात होत्या़ पण बदलत्या काळानुसार यांची जागा ही प्लास्टिकपासून बनविलेल्या वस्तंूनी घेतली.

यामुळे आता यातील काही वस्तू दिसत नाहीत़ पण पारंपरिक सण, उत्सावात मात्र बांबूच्या उत्पादनाला चांगलीच मागणी असते़ याचबरोबर धार्मिक कार्यक्रमासाठी मात्र हमखास बांबूपासून बनविलेल्या वस्तूच घेतल्या जातात.

यामुळे बांबूपासून विविध वस्तू तयार करणारेही आपल्यामध्ये बदल करून घेतला आहे़ तेही आता पारंपरिक वस्तूंसोबत फ्लॉवर पॉट, लॅम्प, टोपी, बादली, शोभेच्या व गृहसजावटीच्या वस्तू बनवत आहेत़ यामुळे काही प्रमाणात मात्र मागणी वाढली आहे.

उत्पादकांची मागणी- बांबूशेती व प्रक्रिया उद्योग फायदेशीर धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत लागणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आज बदललेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू समाजातील सर्व घटकांसाठी फायदेशीर असून, हे सर्व पर्यावरणपूरक आहेत़. प्रदूषणात दिवसेंदिवस अमाप भर घालणाºया प्लास्टिकचे वाढते आक्रमण थोपवण्यासाठी एक चांगली मदत या माध्यमातून होईल़ याचबरोबर बांबू उत्पादकांनाही चालना मिळेल़ यासाठी बांबू उत्पादन वाढवण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. त्या उपाययोजनांची अंमलबजावणीही करण्यात यावी, अशी मागणी बांबू उत्पादकांकडून होत आहे.

शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन व महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून बांबूशेती व बांबू उद्योगास चालना व गती दिली आहे, ही समाधानाची बाब आहे़ बुरुड समाज हा मागास व अशिक्षित असल्यामुळे योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत़ समाजबांधवांनी पारंपरिक व्यवसायाची मानसिकता बदलून आर्थिक प्रगतीसाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन योजनांचा व आधुनिकतेचा विचार करणे ही काळाची गरज आहे.-दशरथ वडतिले, अध्यक्ष, सोलापूर शहर बुरुड समाज.

सध्या प्लास्टिकच्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत़ यामुळे बांबूपासून बनवण्यात येणाºया वस्तूंची मागणी अर्ध्यावर आली आहे़ यामुळे बदलत्या काळानुसार आमच्या वस्तूंमध्ये बदलही करण्यात आले आहेत. यामुळे बाजारात नवीन वस्तंूची मागणी वाढली आहे़ आम्ही तयार केलेले लॅम्प, शोभेच्या वस्तू राज्यभर विकल्या जात आहेत. पण या वस्तूंना खूप कमी दर मिळत असतो़ -ज्ञानेश्वर सुरवसे, व्यापारी 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणPlastic banप्लॅस्टिक बंदी