शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘रासेयो’तून व्यक्तिमत्त्व विकासाला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 11:01 IST

राष्टÑीय सेवा योजनेचा विजय असो...हे सर्व शब्द ऐकले की, आजही ते संगमेश्वर कॉलेजमधील रासेयो दिवस आठवायला लागतात. पदवीच्या शिक्षणाला ...

राष्टÑीय सेवा योजनेचा विजय असो...हे सर्व शब्द ऐकले की, आजही ते संगमेश्वर कॉलेजमधील रासेयो दिवस आठवायला लागतात. पदवीच्या शिक्षणाला असताना रासेयोचा कोर्सही पूर्ण केला. रासेयो हे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक वेगळंच व्यासपीठ उपलब्ध करून देतं. रासेयोमध्ये कोणत्याच गोष्टीचं बंधन नसतं. वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी रासेयोच्या व्यासपीठावर एकत्र येतात. रासेयोमध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. जात, धर्म, स्त्री, पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. रासेयोने आयुष्य कसं जगावं ते मला शिकवलं.

संगमेश्वर कॉलेजमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याबरोबर रासेयोला देखील प्रवेश घेतला आणि कामाला सुरुवात झाली. समविचारी मित्र भेटले, आम्ही प्रत्येक कार्यक्रम, रॅली, व्यवस्थित पार पाडायचो. त्यामुळे सर आमच्यावर खुश असायचे. मला आठवतं आमची पहिली कॉलेज कॅम्प सिद्धेश्वर मंदिरमध्ये होती. पहिल्यांदा सात दिवस निवासी शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात मी माईकवर आणि लोकांसमोर बोलायला शिकलो तो अजून थांबलोच नाही.

या कॅम्पमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मी किचनची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. रासेयोच्या माध्यमातून विटेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप कार्यक्रम पार पाडले. रासेयोच्या दुसºया वर्षात असताना रासेयोची पूर्ण जबाबदारी आमच्या खांद्यावर होती. या वेळेस मला राष्टÑीय एकात्मता शिबिरासाठी बागलकोट या ठिकाणी जाण्याची आणि महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि दुसºया राज्याची संस्कृती शिकायला मिळाली. त्यामुळे परराज्यातही मित्र निर्माण झाले. परंतु, त्याच दिवसांमध्ये आमचा कॉलेज कॅम्प यत्नाळ या ठिकाणी होता. मी शेवटचे दोन दिवस कॉलेज कॅम्पमध्ये गेलो आणि दोन दिवसात सात दिवसांची भर भरून काढली. सगळे खुश झाले होते.

याच वर्षी कॉलेजची नॅक कमिटीची चाचणी होती. त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ फक्त काम आणि वेगवेगळे कार्यक्रमच घ्यायचो. त्या एका वर्षी आम्ही जवळपास १३० कार्यक्रम घेतले होते. आणि नॅकसमोर प्रेझेंट केले होते. त्यानंतर मला कॉलेजची टीम घेऊन राज्यस्तरीय कॅम्पला जाण्याची संधी मिळाली. तो फार वेगळा अनुभव होता. या कॅम्पमध्ये मी एकपात्री नाटक सादर केलं होतं आणि तेव्हा संपूर्ण गाव रडत होतं. इथेच मी जिंकलो होतो. असे बरेच अनुभव रासेयोमुळे मिळत गेले अणि रासेयोची दोन वर्षे पूर्ण झाली.रासेयोची दोन वर्षे पूर्ण झाली तरी तिसºया वर्षी मी नवीन स्वयंसेवकांना मदत करत होतो. तेव्हा बनसोडे सरांकडून खूप चांगल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.

गेल्या वर्षी देखील कॉलेज कॅम्प यत्नाळलाच होता. परंतु, यावर्षी देखील राज्यस्तरीय कॅम्पला जायचं होतं. त्यामुळे दोन दिवस लवकर मी कॅम्पमधून बाहेर पडलो. मी जाताना खूप जणांच्या चेहºयावर नाराजी होती, पण नाईलाज होता.रासेयोने खूप काही दिलं. जिवापाड प्रेम करणारे मित्र दिले. हीच आयुष्याची खरी शिदोरी आहे. आज मला कोणीही विचारलं की, तुला रासेयोने काय दिलं तर मी अभिमानाने सांगेन, ‘माणूस म्हणून जगायला रासेयोने शिकवलं, समाजातील अनेक सामाजिक प्रश्नांची ओळख रासेयोमुळेच झाली, जिवाला जीव देणारे मित्र रासेयोमुळेच भेटले. स्व-ची जाणीव रासेयोमुळेच झाली, व्यक्तिमत्त्व विकासाची संधी रासेयोमुळेच मिळाली, एक उत्कृष्ट मार्गदर्शक विष्णू विटेकर सर रासेयोमुळेच मिळाले, मला हवी तशी आयुष्याची साथीदार रासेयोमुळेच मिळाली. बस्स... आणखी काय हवं. या सगळ्या गोष्टी मला रासेयोमुळेच मिळाल्या म्हणूनच मला म्हणावं               वाटतं ‘राष्ट्रीय सेवा योजना’  जीवनाला आकार देणारी अभ्यास प्रणाली आहे.- विष्णू भोसले(लेखक समाजकार्य अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय