शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चिमुकल्यांच्या पक्षी छावणीत मोरांसंगे चिमण्याही रमल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 17:24 IST

विलास मासाळ  मंगळवेढा: आधीच पाण्याने त्रस्त असलेल्या दुष्काळी भागात यंदा भीषणता अधिक प्रमाणात वाढली आहे. जिथे मनुष्याला खायला काही ...

ठळक मुद्देधान्य अन् पाण्याची सोय, खुपसंगीतील शाळकरी मुले आली एकत्रखुपसंगी हे गाव सातत्याने पाण्याच्या टँकरवर जगणारंया गावातील लवटेवस्ती आणि माळी वस्ती येथील शाळेत जाणारी ८ ते १० मुलं

विलास मासाळ 

मंगळवेढा: आधीच पाण्याने त्रस्त असलेल्या दुष्काळी भागात यंदा भीषणता अधिक प्रमाणात वाढली आहे. जिथे मनुष्याला खायला काही मिळेना तिथे पक्ष्यांकडे कोण पाहणार? अशी स्थिती असताना मंगळवेढा तालुक्यात खुपसंगी गावातील शाळेत शिकणाºया मुलांनी पक्ष्यांची छावणी काढली आहे. या पक्ष्यांना खायला अन्न आणि प्यायला पाणी देऊन या निरागस बालकांच्या चेहºयावरील आनंद अधिक सुखद गारवा देणारा आहे.

खुपसंगी हे गाव सातत्याने पाण्याच्या टँकरवर जगणारं. या गावातील लवटेवस्ती आणि माळी वस्ती येथील शाळेत जाणारी ८ ते १० मुलं. विविध योजनांच्या नावाखाली झालेली वृक्षतोड. ओढा, नाला रुंदीकरणामुळे मोठी झाडे राहिली नाहीत. या भागात असणारे मोर, लांडोर व इतर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जवळपास संपुष्टात आलेला. या भागातील विहिरी कोरड्या, १००० फुटांच्या खाली पाणीपातळी गेलेली. अगदी अंघोळही अर्ध्या बादलीत करावी लागण्याची स्थिती. सतत पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यातच जिंदगी गेली असंच खुपसंगीकरांचं जगणं. माणसाची ही अवस्था असताना जनावरे, पक्ष्यांचा टाहो कोण ऐकणार? 

या पक्ष्यांची ही स्थिती पाहून राजवर्धन गणपतराव लवटे, यश बाळासाहेब लवटे, दादासाहेब बाळासाहेब लवटे, मनोज सुरेश लवटे, श्रेयस सावबा वाले, सुयश सावबा वाले, ओम मोहन माळी, आदित्य नागप्पा वाले, शिवशंकर नागप्पा वाले या मुलांना आपण काही तरी करावं वाटलं. टँकर आल्यानंतर त्यातील वाचलेलं पाणी एकत्र आणतात. शाळेला जाण्यापूर्वी किंवा जाऊन आल्यानंतर ही मुले घरातील गहू, तांदूळ, ज्वारी, मका, तूर असे जे मिळेल ते धान्य झाडाखाली पक्ष्यांना टाकतात. मिळेल तो आसरा शोधणाºया पक्ष्यांना खाऊ घालण्याची ही धडपड पाहून गणपतराव लवटे, सुचिता लवटे, रामदास चौगुले, भगवान चौगुले यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. 

यापेक्षा आनंद वेगळा तो काय ?- आमच्या भागातील पक्षी, प्राणी यांना प्यायला पाणी मिळत नाही. त्यांचे हाल होत आहेत, हे पाहून आम्ही सर्व मित्रांनी त्यांना पाणी आणि धान्य देण्याचा निर्णय घेतला. मोर, लांडोर आणि इतर पक्षी या ठिकाणी येतात. आम्ही दिलेले धान्य खातात, पाणी पितात याचा आम्हाला अधिक आनंद मिळतो असे राजवर्धन लवटे याने सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ