शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास दिवसांमध्ये दीड कोटींचा दंड भरला; मात्र सोलापूरकरांनी नियम नाही पाळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 17:32 IST

कोरोनाशी दोन हात : नाकाबंदी, पेट्रोलिंगदरम्यान कारवाई

सोलापूर : कोरोनाच्या लढाईत शहरवासीयांनी गेल्या ५० दिवसांत दीड कोटी २० लाख २०० रुपयांचा दंड भरला, मात्र नियम पाळला नाही. सतत रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या व पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी कारवाई केली.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूरनाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर दररोज पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवरदेखील नाकाबंदी करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेत अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील भाजीमार्केट असलेल्या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.

नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर ५०० रुपयांचा दंड लावला जातो. दुकाने चालू ठेवलेल्या दुकानदारांवर उल्लंघन कशा पद्धतीने केला आहे. याचे स्वरूप पाहून किमान २००० रुपये, तर जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतचा दंड लावला जातो. डबलसीट फिरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम अन्वये ५०० रुपयांचा दंड लावला जातो. शहरातील विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आळा बसावा यासाठी नाकाबंदी दरम्यान अनेक दुचाकी जप्त केल्या जात आहेत. दि.१ एप्रिल ते २२ मे दरम्यान दररोज अडीच ते साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

वसूल केलेले पैसे भरले जातात शासनाच्या खात्यावर

- नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम दुसऱ्या दिवशी त्रेझरी येथे शासनाच्या खात्यावर भरली जाते. सोलापूर महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही शासनाच्या खात्यावर जमा केली जाते.

 

ग्रामीण भागात अवघ्या पाच दिवसांमध्ये २९ लाख ६७ हजारांचा दंड

- ग्रामीण भागामध्ये ११ तालुक्यांतील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये २९ लाख ६७ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, वेळेनंतर चालू असणाऱ्या दुकानांवर कारवाई करणे, वाहनांवरील कारवाई, ई-पास नसताना प्रवास करणे आदी कारवायांचा समावेश आहे.

 

संचारबंदी जाहीर केल्यापासून दररोज कारवाई सुरू आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत. लोकांनी कुराणाचा गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर पडू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल.

-डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या