शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

राज्यातील १७ साखर कारखान्यांकडे एफआरपीचे १३३ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 15:29 IST

सोलापुर जिल्ह्यातील ४ कारखान्यांचा समावेश : उच्च न्यायालयात साखर आयुक्तालयाचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देकायद्यानुसार ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसात कारखान्याने एफआरपीचे देणे देणे बंधनकारकएफआरपी न देणाºया कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा आदेश १७ साखर कारखाने एफआरपीनुसार १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये शेतकºयांचे देणे

सोलापूर: राज्यातील १७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे अद्यापही १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये दिले नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या वतीने सांगितले. मात्र याला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पुढील सुनावणी (३ नोव्हेंबर)पर्यंत गाळप परवान्याबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले.

एफआरपी थकविणाºया कारखान्याबाबत गोरख घाडगे व सुनील बिराजदार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे व भारती डोंगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मूळ याचिकेत मागील वर्षीच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे एप्रिलमध्ये २१५० कोटी रुपये कारखानदारांनी दिले नसल्याचा उल्लेख आहे. यावर न्यायालयात मागील सुनावणीवेळी २६ साखर कारखान्यांकडे १७६ कोटी ४१ लाख रुपये एफआरपीपोटी देय असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगितले होते. बुधवारी उच्नन्यायालयातीलसुनावणीवेळी १७ साखर कारखाने एफआरपीनुसार १३२ कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये शेतकºयांचे देणे असल्याचे सांगण्यात आले. यावरयाचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. आशिष गायकवाड यांनी हरकत घेतली. 

कायद्यानुसार ऊस गाळपाला गेल्यानंतर १४ दिवसात कारखान्याने एफआरपीचे देणे देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नियमानुसार उशिरा पैसे देणाºया कारखान्यांनी व्याजाचीही रक्कम दिली पाहिजे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले. यावर न्यायालयाने मार्ग काढा, परंतु पुढील सुनावणीपर्यंत एफआरपी न देणाºया कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा आदेश कायम असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकाºयांना सांगितले. पुढील सुनावणी ३ नोव्हेंबरला होणार आहे. 

सोलापूरचे चार कारखानेसिद्धेश्वर सोलापूर (३ कोटी १७ लाख), मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट (९ कोटी ४२ लाख), विठ्ठल रिफाईन करमाळा (६ कोटी एक लाख), श्री मकाई करमाळा (एक कोटी ५७ लाख) या कारखान्यांकडे एफआरपी देय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरीagricultureशेती