शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शक्तीपीठ मार्गाला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

By दिपक दुपारगुडे | Updated: June 12, 2024 13:03 IST

शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ,उत्तर सोलापूर,सांगोला या तालुक्यांमधून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची पावले सरकारकडून वेगाने उचलली जात असताना या प्रकल्पाला विरोध वाढत आहे.

प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. योग्य मोबदला दिला नाही तर या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जमीन देणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी दिला. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर-गोवा यादरम्यान नव्यानेच बांधलेले सहा पदरी महामार्ग अस्तित्वात असताना ८५ हजार कोटी खर्चून हा नवा महामार्ग बांधण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारत सरकारला कंत्राटदारांची घरे भरावयाची आहेत काय? असा सवाल उपस्थित केला. या मेळाव्यास संपर्कप्रमुख शरद पवार,नगरसेवक सत्यवान गायकवाड, दिनेश घागरे, बाळासाहेब पवार, महेश बिले, सागर बिले, प्रभाकर केंगार,गजानन पाटील,राहुल जमदाडे,नागनाथ कापसे, विश्वास चव्हाण,भैय्या चव्हाण,सुनील चव्हाण,अमोल पाटील आदी उपस्थित होते.

२२ मागण्यासांठी शेतकरी आक्रमकयावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा व त्यांना त्वरित शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, महामार्गामुळे खंडित होणारे रस्ते व पडणाऱ्या जमिनीच्या तुकड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर परिपूर्ण तांत्रिक उपाययोजना व्हावी व शेतकऱ्यांसोबत खासगी वाटाघाटीच्या चर्चेने जमिनीचे बाजार मूल्याप्रमाणे योग्य किंमत व पिकांचे पंचनामा मूल्य ठरवूनच नुकसान भरपाई रक्कम जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसह इतर २२ मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर