शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीतल्या एका पक्षाकडून पूरग्रस्तांच्या मदतीला विरोध; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:46 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्दे२५ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांचा मेळावापूरग्रस्तांना तत्काळ पाच हजार रुपये द्यापूरग्रस्त शेतकºयांना सरसकट खावटी मदत दोन दिवसात द्यावी

सोलापूर : महाआघाडीतला एक पक्ष सहकार क्षेत्रावर वर्चस्व राखून आहे. त्याच हितसंबंधातून साखर कारखानदारांना अनुदान देण्यासाठी हा पक्ष तयारी करतोय. त्यामुळे सध्या राज्यभरातील पूरग्रस्तांना मदत मिळू नये. अनुदान मिळू नये, याकरिता महाआघाडीतला हा पक्ष त्यांच्या मित्र पक्षांवर दबाव टाकतोय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

त्यांचा रोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होता. राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता त्यांनी पूरग्रस्तांच्या विरोधात दबाव टाकणाºया तसेच सहकार हित जोपासणाºया राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केला. सोलापूर जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूर आला आहे. पूरग्रस्त गावांच्या भेटीकरिता डॉ. आंबेडकर हे मंगळवारी सोलापूर दौºयावर होते. दरम्यान, त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. महाराष्ट्रातले हे सरकार तीन पायांवर चालणारे सरकार आहे. त्यातील एक पाय इतर दोन पायांवर दबाव टाकतोय. पूरग्रस्त शेतकºयांना अनुदान मिळू नये, यासाठी तो प्रयत्न करतोय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

डॉ. आंबेडकर म्हणाले, तीन पायांवर चालणाºया या सरकारात ताळमेळ नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना मदत करण्याच्या विषयावर अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यसनी आहेत, ते देश विकायला चाललेत. त्यांची अवस्था एका दारुड्याप्रमाणे झाली आहे.----------पूरग्रस्तांना तत्काळ पाच हजार रुपये द्याआपत्तीकाळात शेतक?्यांना खावटी मदत देण्याची शासकीय पद्धत कार्यरत आहे. ज्या पूरग्रस्त शेतक?्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना शासनाकडून महिनाभर पुरेल इतकं चांगलं धान्य, कपडे, भांडीकुंडी तसेच पाच हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम तत्काळ मदत देण्याची पद्धत आहे. राज्यातील सर्व पूरग्रस्त शेतकºयांना सरसकट खावटी मदत दोन दिवसात द्यावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

२५ आॅक्टोबरला ऊसतोड कामगारांचा मेळावा२५ आॅक्टोबरला बीड येथील भगवानगड पायथ्याशी ऊसतोड कामगार, मुकादम तसेच कमिशन एजंट यांचा जाहीर मेळावा घेत आहोत. पाच वर्षांपूर्वी सरकारसोबत ऊसतोड कामगारांचा करार झाला होता. करार संपला असून नवीन करार व्हायला पाहिजे. त्याकरिता हा मेळावा आयोजित केला आहे. ७ कामगार संघटनांचा यात सहभाग आहे. जाहीर मेळाव्याचे नेतृत्व मी करतोय. नवीन करार झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही; अन्यथा कामगार संपावर जाणार आहेत, अशी माहिती यावेळी आंबेडकर यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण