शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : ‘प्रेमा तुझा रंग कसा ?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:15 PM

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम.

प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीची भुरळ आजही प्रेक्षकांवर कायम आहे, याची प्रचिती आपणास ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा प्रयोग पाहिल्यानंतर येते. प्रा. कानेटकरांची संवादशैली, पात्रांच्या वृत्ती व स्वभावामधून निर्माण होणारे नर्मविनोद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य. फार्स आणि विनोदी पद्धतीने जाणारे हे नाटक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रेमाला बंधन नसते, निस्सीम प्रेम म्हणजे त्याग व उदात्त समर्पण. नि:स्वार्थी, निरपेक्षपणे केलेलं प्रेम हे चिरकाल टिकणारं असतं. मात्र प्रेमात जेव्हा व्यवहार येतो तेव्हा सुरू होते असूया आणि द्वेष. मानवी जीवनाच्या एका विशिष्ट वळणावर व्यक्तीला केव्हा ना केव्हा प्रेम होतेच. या प्रेमाची परिणिती, त्याचा प्रवास भविष्यामध्ये कशारीतीने होतो याचा नाट्यानुभव म्हणजे ‘प्रेमा तुझा रंग कसा?’. 

प्रा. बल्लाळ (रवींद्र ढवळे) मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा (निशिगंधा घाणेकर) यांचा २५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलेले असते. यांची दोन मुलं बच्चू (सुयोग कुलकर्णी) आणि बब्बड (भावना भालेराव). नवीन पिढीस कायम असे वाटते की, जुनी पिढी आमचं प्रेम समजूनच घेत नाही. बब्बड व बाजीराव (ऋषीकेश गोटे) यांची देखील हीच अडचण आहे. बच्चू तीन वेळा प्रेमभंग होऊन परत सुशीलच्या (मीरा जोशी) प्रेमात पडतो. सुशील मात्र बच्चूवर विविध मानसशास्त्रीय प्रयोग करत असते. परंतु हे प्रयोग बच्चूस प्रेमच वाटतं. पुढे सुशील सर्जेराव सोबत लग्न करते आणि परत एकदा बच्चूचा प्रेमभंग होतो. 

रवींद्र ढवळे यांनी आपल्या दिग्दर्शनामधून आणि प्रा. बल्लाळ या मुख्य भूमिकेमधून नाटकास वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. प्रियंवदा या भूमिकेमध्ये निशिगंधा घाणेकर यांची भूमिकेची समज खूप छान होती. महेंद्र दीक्षित यांनी रंगवलेला निळूभाऊ हा साठच्या दशकाची पुरेपूर आठवण करून देतो. काळी टोपी, काळा कोट, धोतर आणि काठी यामुळे ह्यनिळूभाऊह्ण हे पात्र अधिक उठावदार झाले. त्यांची अनुनासिक बोलण्याची पद्धत आणि ह्यराम कृष्ण हरीह्ण भाव खाऊन गेले. बच्चू, सुशील, बाजीराव, बब्बड यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. 

अमोल काबरा यांनी पार्श्वसंगीतामध्ये प्रसंगानुरूप निवडलेली गाणी रंजकता वाढवणारी होती. नेपथ्यामध्ये अरविंद देशपांडे आणि कैलास डिडवानी यांनी उभे केलेले सुखवस्तू घर, दिवाणखाना व गॅलरी प्रयोगास पूरक होते.

‘प्रेमा तुझा रंग कसा?’ या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास प्रा. कानेटकरांनी उभ्या केलेल्या पात्रामधून मिळते. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा यांच्या प्रेमाची परिपूर्णता. निळूभाऊ आपल्या पत्नीवर आजारी असून देखील तेवढेच प्रेम करतात ही त्यागीवृत्ती. अवखळ, निरागस असं प्रेम आहे बाजी आणि बब्बड यांचं. एकतर्फी, वारंवार प्रेमभंग होऊन देखील व्यवहारी शहाणपण नसणारा आणि परत प्रेमात पडणारा बच्चू. 

पूर्वी जे घडले तेच आजही घडले आणि आजपासून २५ वर्षांनंतर देखील याच पद्धतीने हे प्रेमाचे रंग असेच आपणासमोर उलगडतील. यातील मुख्य पात्र असतील आपली पुढची पिढी. प्रेमाचा हा उत्कट, तरल, भावपूर्ण, विरह, त्याग, निरपेक्ष, एकतर्फी, विरक्त प्रवास वळणावळणाने जाऊन शेवटी सप्तरंगामध्ये सामावून जातो. प्रा. कानेटकर यांनी प्रेमाचे हेच विविध रंग, प्रेमाचे हळुवार नाजूक धागे अलगदपणे आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. - प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर.

टॅग्स :SolapurसोलापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे