शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सोलापूर जिल्ह्यातून लोकसभेच्या रणामध्ये लढल्या फक्त आठ रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 14:52 IST

रवींद्र देशमुख  सोलापूर : ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत महिलांना समाधानकारक प्रतिनिधीत्व देण्याचा सध्याचा काळ असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना संधी देण्याचे ...

ठळक मुद्देउज्ज्वलातार्इंना सर्वाधिक तीन लाखांवर; प्रभाताई झाडबुके यांना मिळाली होती ६५ हजार मतेलोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार नसतात हे खरं तर दुर्देवी - शोभा बनशेट्टीलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना जास्तीत जास्त आरक्षण असायला हवे - शोभा बनशेट्टी

रवींद्र देशमुख 

सोलापूर : ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत महिलांना समाधानकारक प्रतिनिधीत्व देण्याचा सध्याचा काळ असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना संधी देण्याचे प्रमाण आजही अल्पच आहे. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या १९५१ पासूनच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून केवळ ८ रणरागिणींनी लोकसभेच्या रणात लढत दिली आहे. काँग्रेसने सन २००४ मध्ये उज्ज्वलाताई शिंदे यांना लढण्याची संधी दिली. त्यांनी तीन लाखांवर मते घेतली. तत्पूर्वी १९८० मध्ये बार्शीच्या प्रभाताई झाडबुके यांनी अर्स काँग्रेसकडून दोन हात केले. जिल्ह्यातील या महिला उमेदवारांच्या पदरी मात्र अपयश आले; पण त्या रणांगणात उतरल्या हेच लोकशाहीसाठी पोषक मानले जात आहे.

काँग्रेसचे त्यावेळी दोन गट होते. सोलापूर मतदारसंघात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला मानणाºया काँग्रेसकडून १९८० साली गंगाधरपंत कुचन निवडणूक रिंगणात होते; तर इंदिराबार्इंशी बंड करणाºया नेत्यांच्या काँग्रेसकडून बार्शीच्या प्रभाताई झाडबुके यांनी लढत दिली होती. त्यांच्याच शहरातील ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा हेही जनता पक्षाकडून नशीब आजमावित होते. या निवडणुकीत कुचन विजयी झाले; पण जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी लढणाºया पहिल्या महिला म्हणून प्रभातार्इंनी इतिहासात नाव कोरले. त्यांना ६५ हजार ७७ अर्थात १७.१० टक्के मते मिळाली. १९९१ मध्ये कलावती गायधनकर या महिलेने अपक्ष म्हणून सोलापुरात नशीब आजमाविले होते.

सोलापूरमध्येच १९९८ मध्ये इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्या पत्नी भारती पाटील यांनी जनता दलाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना २६८३८ मतांवर समाधान मानावे लागले. भारती पाटील यांनी प्रभावीपणे प्रचार केला होता. मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत त्या आणि त्यांचे समर्थक पोहोचले होते. निवडणुकीतील त्यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लक्षात राहणारा ठरला.

सन २००४ च्या निवडणुकीत उज्ज्वलाताई शिंदे या काँग्रेसकडून लढण्यासाठी पुढे आल्या. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा असल्यामुळे उज्ज्वलातार्इंना निवडणुकीत उतरावे लागले. यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला. नागमणी जक्कन या अपक्ष महिला उमेदवाराने काँग्रेसची मते खेचल्यामुळे उज्ज्वलातार्इंना पराभवास सामोरे जावे लागले, असे त्यावेळी राजकीय निरीक्षकांनी विश्लेषण केले होते. या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले; पण उज्ज्वलातार्इंना ३ लाख १० हजार ३९० मते मिळाली. याच निवडणुकीत पंढरपुरात डॉ. श्रध्दा हरिदास सोनवणे या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या होत्या.

सन २००९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे देशात चर्चेत आलेल्या माढा मतदारसंघात सोलापूरच्या नागमणी जक्कन यांनी उमेदवारी दाखल केली होती; तर सन २०१४ मध्ये माढ्यातून अ‍ॅड. सविता शिंदे यांनी आम आदमी पक्षाकडून नशीब आजमाविले. त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यावेळी परिश्रम घेतले होते.

सोलापूर, (पंढरपूर), माढ्यातील महिला उमेदवार

  • १९८० (सोलापूर)    प्रभावती झाडबुके (अर्स काँग्रेस)    ६५०७७
  • १९९१ (सोलापूर)    कलावती गायधनकर (अपक्ष)    ३८५४
  • १९९८ (सोलापूर)    भारती पाटील (जनता दल)    २६८३८
  • २००४ (सोलापूर)    उज्ज्वलाताई शिंदे (काँग्रेस)    ३१०३९०
  • २००४ (सोलापूर)    नागमणी जक्कन        ८५०३
  • २००४ (पंढरपूर)    डॉ. श्रध्दा सोनवणे        १२८९५
  • २००९ (माढा)    नागमणी जक्कन        २७९९
  • २०१४ (सोलापूर)    छाया केवाळे            १६५४
  • २०१४ (माढा)    अ‍ॅड. सविता शिंदे        ७१६०

लोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार नसतात हे खरं तर दुर्देवी आहे. महापौर पदावर काम करताना एक महिला म्हणून त्रास दिला जातो. इतर महिलाही ही गोष्ट पाहत असतील. त्यामुळेच त्या राजकारणात यायला तयार नसतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना जास्तीत जास्त आरक्षण असायला हवे. - शोभा बनशेट्टी, महापौर, सोलापूर मनपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिलाPoliticsराजकारण