शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:31 IST

अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था

ठळक मुद्दे१५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्थावारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आलीसमाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात़ या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी दिली़

आषाढी वारी काळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया, गॅस्ट्रोसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंढरपुरात येणाºया भाविकांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असते़ अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रा काळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री वारीदरम्यान दर्शन रांगेतील वारकºयांना स्वच्छ पाणी व चहाची मोफत सोय करण्यात आली होती़ मात्र यंदा प्रथमच दर्शन रांगेसह मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेल्या ६५ एकर परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाºया भाविकांचा विमा मंदिर समितीकडून उतरविण्यात येणार असून याचा भाविकांना दुर्घटनेच्यावेळी उपयोग होणार आहे. शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ यावर विठ्ठल गाभाºयातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती़ यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकºयांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे डॉ़ भोसले यांनी सांगितले.अध्यक्षांनी केली पत्राशेडची पाहणीच्आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाºया भाविकांच्या सुविधेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘श्री’च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्राशेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नयेत, यासाठी प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहे़ त्याची पाहणी बुधवारी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केली़ त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीWaterपाणीAtul Bhosaleअतुल भोसले