शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:31 IST

अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था

ठळक मुद्दे१५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्थावारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आलीसमाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात़ या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी दिली़

आषाढी वारी काळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया, गॅस्ट्रोसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंढरपुरात येणाºया भाविकांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असते़ अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रा काळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री वारीदरम्यान दर्शन रांगेतील वारकºयांना स्वच्छ पाणी व चहाची मोफत सोय करण्यात आली होती़ मात्र यंदा प्रथमच दर्शन रांगेसह मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेल्या ६५ एकर परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाºया भाविकांचा विमा मंदिर समितीकडून उतरविण्यात येणार असून याचा भाविकांना दुर्घटनेच्यावेळी उपयोग होणार आहे. शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ यावर विठ्ठल गाभाºयातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती़ यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकºयांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे डॉ़ भोसले यांनी सांगितले.अध्यक्षांनी केली पत्राशेडची पाहणीच्आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाºया भाविकांच्या सुविधेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘श्री’च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्राशेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नयेत, यासाठी प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहे़ त्याची पाहणी बुधवारी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केली़ त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीWaterपाणीAtul Bhosaleअतुल भोसले