शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आषाढीसाठी येणाºया भाविकांना मिळणार आता शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:31 IST

अतुल भोसले : १५ लाख लिटर पाणी वाटपाची व्यवस्था

ठळक मुद्दे१५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्थावारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आलीसमाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम

पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात़ या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वारकºयांना स्वच्छ मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात असून समितीने १५ लाख लिटर मिनरल वॉटर आणि वितरण व्यवस्था उभी करण्याची तयारी केल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी दिली़

आषाढी वारी काळात दूषित पाण्यामुळे शेकडो भाविकांना डायरिया, गॅस्ट्रोसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. पंढरपुरात येणाºया भाविकांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असते़ अशा भाविकांना दूषित पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यात्रा काळात शहरात १२ ते १५ लाख भाविक येत असल्याने प्रशासनाकडून होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण येत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने यंदा प्रथमच शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने भाविकांना यंदा मिनरल वॉटर पिण्यास मिळणार आहे.यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री वारीदरम्यान दर्शन रांगेतील वारकºयांना स्वच्छ पाणी व चहाची मोफत सोय करण्यात आली होती़ मात्र यंदा प्रथमच दर्शन रांगेसह मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, भाविकांसाठी उभारलेल्या ६५ एकर परिसरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मिनरल वॉटर वितरणाची व्यवस्था समितीने करण्याचे नियोजन केल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. याशिवाय यंदाही दर्शनासाठी येणाºया भाविकांचा विमा मंदिर समितीकडून उतरविण्यात येणार असून याचा भाविकांना दुर्घटनेच्यावेळी उपयोग होणार आहे. शहरातील १५ ठिकाणी समितीने मोठे एलईडी स्क्रीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ यावर विठ्ठल गाभाºयातील देवाचे दर्शन २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. गेल्या आषाढी दशमीला मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीची घोषणा केली होती़ यावर्षी नवीन समितीला काम करण्यासाठी ही पहिलीच यात्रा मिळाल्याने वारकºयांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा निर्णय समिती घेणार असल्याचे डॉ़ भोसले यांनी सांगितले.अध्यक्षांनी केली पत्राशेडची पाहणीच्आषाढी यात्रेमध्ये दर्शनास येणाºया भाविकांच्या सुविधेकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘श्री’च्या पदस्पर्श दर्शन रांगेत पत्राशेड येथे उभ्या असलेल्या भाविकांना पायास खडे टोचू नयेत, यासाठी प्रथमच २४,००० चौरस फूट इतके मॅट टाकण्यात आले आहे़ त्याची पाहणी बुधवारी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केली़ त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीWaterपाणीAtul Bhosaleअतुल भोसले