शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कोयनेच्या ६ हजार धरणग्रस्तांना नोटीसा; जमीन व भूखंड वाटपातील गैरव्यवहार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 13:36 IST

मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील दुबार व अतिरिक्त वाटप केलेल्या जमिनी, भूखंड सरकारजमा होणार

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

कोयना धरणग्रस्तांच्या यादीत २ हजार ६२८ खातेदारांना दुबार, तर ३ हजार ५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहा हजार १५८ खातेदारांना वाटप झालेल्या सोलापूर, सातारा, रायगड येथील जमिनी वाटपातील घोळ समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक दुबार व अतिरिक्त वाटप मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ,  उत्तर सोलापूर तालुक्यात केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दुबार व अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी परत घेण्यासाठी संबंधित खातेदारांना नोटीस पाठवण्यात येत आहेत. या जमिनी संबंधितांनी शासनाकडे तातडीने परत कराव्यात अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत. या नोटीसामुळे पुनर्वसन विभागातील जमीन व भूखंड वाटप घोटाळा चव्हाट्यावर आला आहे.

कोयना धरणासाठी जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील ९८ गावांतील १८७ गावठाणांतील नऊ हजार ८०० खातेदार आहेत. त्याची नोंद शासनाकडे आहे. अनेक पात्र खातेदार मात्र वंचित आहेत. श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून   सात वर्षांपासून न्याय्य हक्काचा लढा सुरू आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी जाहीर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मुदत संपल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना जादा वाटप केलेली जमीन काढून घेण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून चालू केली आहे. ज्या खातेदारांना दुबार व अतिरिक्त जमिनीचे वाटप झाले आहे. अशा लोकांचे रेकॉर्ड उपलब्ध झाल्याने त्या खातेदारांना सातारा महसूल विभागाने नोटीस पाठवल्या आहेत.

जादा जमीन वाटप झाली असून, त्या जमिनी परत करा, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. कोयना धरणास लाभक्षेत्र नसल्याने सातारा,सोलापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे. धरण बांधताना पुनर्वसन कायदा नव्हता. त्यामुळे त्याचा फार मोठा फटका त्यांना बसला आहे.

कोयना धरणासाठी २५ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र संपादित झाली आहे. त्यात १८७ गावठाणे आहेत. सध्या नऊ हजार १७१ खातेदारांची नोंद आहे. सात हजार जणांना पर्यायी जमिनी वाटप केल्या आहेत. अद्यापही सुमारे दीड हजार खातेदार वाटपापासून वंचित आहेत. 

सोलापूर जिल्हा पुनर्वसन

विभागाकडून नियमाची पायमल्ली

सोलापूर पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या१ जानेवारी २०१५ पासून ते २० सप्टेबर २००१ पर्यंतच्या कार्यकाळात  पुनर्वसन जमीन व भूखंड वाटपात मोठा सावळा गोंधळ झाल्याची तक्रारी  स्वाभिमानी कडे  प्राप्त झाल्या आहेत. भूखंड उजनी प्रकल्पग्रस्ताला राखीव असताना कोयना खातेदाराला शासकीय नियम डावलून बेकायदेशिरित्या वाटप केले. याच जमीनीचे न्यायालयीन वाद विशेषता स्थगीती आदेश असताना एजंटना  हाताशी धरून जमीनीचे व भूखंडाचे वाटप केले. यामध्ये  जिल्हा पुनवर्सन अधिकारी  मोहिनीं चव्हाण, पुनर्वसन तहसीलदार  यासह  कार्यालयातील अधिकारी, कर्मचायांनी संगणमतानी मोठ्या आर्थीक उलाढालीतून शासनाची मोठी  फसवणूक केली आहे याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी  स्वतंत्र समिती नेमून  सखोल चौकशी केल्यास शेकडो एकर बेकायदेशीर जमीन व भूखंड वाटप घोटाळा समोर येईल यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडुन सखोल चौकशी करावी  अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली आहे..........................................

कोयना प्रकल्पग्रस्त खातेदारांना चार एकर जमीन देय असताना त्यांना ८ ते १० एकर जादा जमीन वाटप झाल्या आहेत. अतिरिक्त वाटप झालेल्या खातेदारांची संख्या दोन हजार ६२८ आहे. दुबार वाटप झालेल्या खातेदारांची संख्या तीन हजार ५३० आहे. मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातही दुबार व अतिरिक्त वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या निर्देशांप्रमाणे सातारा जिल्हा दुबार व अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी परत घेण्यासाठी संबंधित खातेदारांना नोटीस पाठवली आहे. जमीन परत दिली नाही तर कायदेशीर कारवाई होणार आहे. अपात्र धरणग्रस्तांच्या जमिनी काढून घेण्याबरोबरच पात्र धरणग्रस्तांना जामीन व भूखंड दिला जाईल असे साताराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSatara areaसातारा परिसरfraudधोकेबाजी