शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अजून खरा रंग भरलाच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:30 IST

राजकीय: आवाज कुणाचा ?

समीर इनामदार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि लोकांचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात ग्रामीण भागात ते होताना दिसले नाही. यामागचे कारण होते ते म्हणजे रुसलेला पाऊस. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी फार मोठा नाही परंतु समाधानकारक पाऊस पडला आणि लोकांना ओढ लागली ती काळ्या कसदार मातीची कुस उजविण्याची. निवडणुका येतात आणि जातात, लोकांना प्रत्यक्षात पडले आहे, ते पोटापाण्याचे. गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाने दडी मारल्याने अनेकांना उत्पन्न मिळू शकले नाही. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सारं काही ठप्प पडलंय की काय? अशी भावना निर्माण झाली होती.

यंदाही तसंच काहीसं होतंय असे वाटत असताना पावसाने हजेरी लावल्याने मतदार सुखावलाय असं काहीअंशी म्हणता येईल. त्यातच उमेदवार कोण उभे राहणार आणि कोणत्या पक्षातून उभे राहणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवार आपला बी फॉर्म सादर करीत नाहीत, तोपर्यंत मतदार आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत हेही खरे आहे. त्यामुळे अजून तरी ग्रामीण भागात वातावरण तापलेले आहे, असे म्हणता येणार नाही. पुढील चार दिवसांत माहोल गरम होईल आणि मग सुरू होईल खºया अर्थाने निवडणुकांची लढाई. अर्थात आता नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यामुळे मतदार धार्मिकदृष्ट्या त्याठिकाणी आहेत. हे नऊ दिवस गेल्यानंतर मग मतदार निवडणुकांमध्ये खºया अर्थाने सहभागी होईल.

लोकांमध्ये निवडणुकांप्रती इतका उत्साह का नाही? यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. काहींना राजकारणात रस नसेल, काहींचा सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत भ्रमनिरास झाला असेल, काहींना मतदान करूनही काही उपयोग होत नाही असे वाटत असेल. कारणे जरी वेगवेगळी असली तरी आपला लोकप्रतिनिधी जो पुढील पाच वर्षांसाठी निवडून देणारा असतो, त्याविषयी इतकीही नाराजी असणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार असे आपण म्हणतो, प्रत्यक्षात ते लोकांसाठी किती काम करते यावरही लोकांचा त्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सजग राहतो. लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी निवडून दिलेले सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम करते यावरही लोकांचा निवडणुकांबाबतचा उत्साह टिकून असतो. अथवा मतदानादिवशी दांडी मारुन फिरायला जाणे हेच सुरू राहू शकते.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण