शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

अजून खरा रंग भरलाच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:30 IST

राजकीय: आवाज कुणाचा ?

समीर इनामदार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि लोकांचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात ग्रामीण भागात ते होताना दिसले नाही. यामागचे कारण होते ते म्हणजे रुसलेला पाऊस. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी फार मोठा नाही परंतु समाधानकारक पाऊस पडला आणि लोकांना ओढ लागली ती काळ्या कसदार मातीची कुस उजविण्याची. निवडणुका येतात आणि जातात, लोकांना प्रत्यक्षात पडले आहे, ते पोटापाण्याचे. गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाने दडी मारल्याने अनेकांना उत्पन्न मिळू शकले नाही. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सारं काही ठप्प पडलंय की काय? अशी भावना निर्माण झाली होती.

यंदाही तसंच काहीसं होतंय असे वाटत असताना पावसाने हजेरी लावल्याने मतदार सुखावलाय असं काहीअंशी म्हणता येईल. त्यातच उमेदवार कोण उभे राहणार आणि कोणत्या पक्षातून उभे राहणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवार आपला बी फॉर्म सादर करीत नाहीत, तोपर्यंत मतदार आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत हेही खरे आहे. त्यामुळे अजून तरी ग्रामीण भागात वातावरण तापलेले आहे, असे म्हणता येणार नाही. पुढील चार दिवसांत माहोल गरम होईल आणि मग सुरू होईल खºया अर्थाने निवडणुकांची लढाई. अर्थात आता नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यामुळे मतदार धार्मिकदृष्ट्या त्याठिकाणी आहेत. हे नऊ दिवस गेल्यानंतर मग मतदार निवडणुकांमध्ये खºया अर्थाने सहभागी होईल.

लोकांमध्ये निवडणुकांप्रती इतका उत्साह का नाही? यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. काहींना राजकारणात रस नसेल, काहींचा सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत भ्रमनिरास झाला असेल, काहींना मतदान करूनही काही उपयोग होत नाही असे वाटत असेल. कारणे जरी वेगवेगळी असली तरी आपला लोकप्रतिनिधी जो पुढील पाच वर्षांसाठी निवडून देणारा असतो, त्याविषयी इतकीही नाराजी असणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार असे आपण म्हणतो, प्रत्यक्षात ते लोकांसाठी किती काम करते यावरही लोकांचा त्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सजग राहतो. लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी निवडून दिलेले सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम करते यावरही लोकांचा निवडणुकांबाबतचा उत्साह टिकून असतो. अथवा मतदानादिवशी दांडी मारुन फिरायला जाणे हेच सुरू राहू शकते.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण