शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

अजून खरा रंग भरलाच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:30 IST

राजकीय: आवाज कुणाचा ?

समीर इनामदार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि लोकांचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात ग्रामीण भागात ते होताना दिसले नाही. यामागचे कारण होते ते म्हणजे रुसलेला पाऊस. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी फार मोठा नाही परंतु समाधानकारक पाऊस पडला आणि लोकांना ओढ लागली ती काळ्या कसदार मातीची कुस उजविण्याची. निवडणुका येतात आणि जातात, लोकांना प्रत्यक्षात पडले आहे, ते पोटापाण्याचे. गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाने दडी मारल्याने अनेकांना उत्पन्न मिळू शकले नाही. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सारं काही ठप्प पडलंय की काय? अशी भावना निर्माण झाली होती.

यंदाही तसंच काहीसं होतंय असे वाटत असताना पावसाने हजेरी लावल्याने मतदार सुखावलाय असं काहीअंशी म्हणता येईल. त्यातच उमेदवार कोण उभे राहणार आणि कोणत्या पक्षातून उभे राहणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवार आपला बी फॉर्म सादर करीत नाहीत, तोपर्यंत मतदार आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत हेही खरे आहे. त्यामुळे अजून तरी ग्रामीण भागात वातावरण तापलेले आहे, असे म्हणता येणार नाही. पुढील चार दिवसांत माहोल गरम होईल आणि मग सुरू होईल खºया अर्थाने निवडणुकांची लढाई. अर्थात आता नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यामुळे मतदार धार्मिकदृष्ट्या त्याठिकाणी आहेत. हे नऊ दिवस गेल्यानंतर मग मतदार निवडणुकांमध्ये खºया अर्थाने सहभागी होईल.

लोकांमध्ये निवडणुकांप्रती इतका उत्साह का नाही? यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. काहींना राजकारणात रस नसेल, काहींचा सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत भ्रमनिरास झाला असेल, काहींना मतदान करूनही काही उपयोग होत नाही असे वाटत असेल. कारणे जरी वेगवेगळी असली तरी आपला लोकप्रतिनिधी जो पुढील पाच वर्षांसाठी निवडून देणारा असतो, त्याविषयी इतकीही नाराजी असणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार असे आपण म्हणतो, प्रत्यक्षात ते लोकांसाठी किती काम करते यावरही लोकांचा त्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सजग राहतो. लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी निवडून दिलेले सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम करते यावरही लोकांचा निवडणुकांबाबतचा उत्साह टिकून असतो. अथवा मतदानादिवशी दांडी मारुन फिरायला जाणे हेच सुरू राहू शकते.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण