शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अजून खरा रंग भरलाच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:30 IST

राजकीय: आवाज कुणाचा ?

समीर इनामदार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि लोकांचा उत्साह वाढेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात ग्रामीण भागात ते होताना दिसले नाही. यामागचे कारण होते ते म्हणजे रुसलेला पाऊस. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी फार मोठा नाही परंतु समाधानकारक पाऊस पडला आणि लोकांना ओढ लागली ती काळ्या कसदार मातीची कुस उजविण्याची. निवडणुका येतात आणि जातात, लोकांना प्रत्यक्षात पडले आहे, ते पोटापाण्याचे. गेल्या दोन ते तीन वर्षांत पावसाने दडी मारल्याने अनेकांना उत्पन्न मिळू शकले नाही. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सारं काही ठप्प पडलंय की काय? अशी भावना निर्माण झाली होती.

यंदाही तसंच काहीसं होतंय असे वाटत असताना पावसाने हजेरी लावल्याने मतदार सुखावलाय असं काहीअंशी म्हणता येईल. त्यातच उमेदवार कोण उभे राहणार आणि कोणत्या पक्षातून उभे राहणार याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे जोपर्यंत उमेदवार आपला बी फॉर्म सादर करीत नाहीत, तोपर्यंत मतदार आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत हेही खरे आहे. त्यामुळे अजून तरी ग्रामीण भागात वातावरण तापलेले आहे, असे म्हणता येणार नाही. पुढील चार दिवसांत माहोल गरम होईल आणि मग सुरू होईल खºया अर्थाने निवडणुकांची लढाई. अर्थात आता नवरात्र महोत्सव सुरू आहे, त्यामुळे मतदार धार्मिकदृष्ट्या त्याठिकाणी आहेत. हे नऊ दिवस गेल्यानंतर मग मतदार निवडणुकांमध्ये खºया अर्थाने सहभागी होईल.

लोकांमध्ये निवडणुकांप्रती इतका उत्साह का नाही? यामागची कारणेही वेगवेगळी आहेत. काहींना राजकारणात रस नसेल, काहींचा सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत भ्रमनिरास झाला असेल, काहींना मतदान करूनही काही उपयोग होत नाही असे वाटत असेल. कारणे जरी वेगवेगळी असली तरी आपला लोकप्रतिनिधी जो पुढील पाच वर्षांसाठी निवडून देणारा असतो, त्याविषयी इतकीही नाराजी असणे हे लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार असे आपण म्हणतो, प्रत्यक्षात ते लोकांसाठी किती काम करते यावरही लोकांचा त्याविषयीचा दृष्टिकोन अधिक सजग राहतो. लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी निवडून दिलेले सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीने काम करते यावरही लोकांचा निवडणुकांबाबतचा उत्साह टिकून असतो. अथवा मतदानादिवशी दांडी मारुन फिरायला जाणे हेच सुरू राहू शकते.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण