शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सोलापूरच्या ५ पैकी एकाही भाजप आमदाराला मंत्रिपदासाठी फोन नाही; जिल्ह्याला पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:34 IST

मागील टर्ममध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले होते.

Solapur BJP ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात होणार आहे. या शपथविधीसाठी विविध जिल्ह्यांतील आमदारांना पक्षनेतृत्वाकडून फोन करण्यात आले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असताना यापैकी एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला नसल्याचे समजते. 

भाजपचे आमदार सुभाष देशमुख वगळता भाजपचे इतर चार आमदार आज अधिवेशनासाठी नागपुरात हजर राहणार आहेत. राज्य सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नावे चर्चेत होती. आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी मुंबईतील मित्रांनी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिपदासाठी निवड झालेल्या आमदारांना फोन करतील, असे वृत्त शनिवारी आले होते. भाजप आमदारांचे निकटवर्तीय लोक मुख्यमंत्री कार्यालयातील फोनच्या प्रतीक्षेत असल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. 

आमदार सुभाष देशमुख शनिवारी दिवसभर लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनात व्यस्त होते. आमदार विजयकुमार देशमुख मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव दिवसभर सर्वाधिक चर्चेत होते. ते सुद्धा अक्कलकोट शहरातील एका कार्यक्रमात व्यस्त होते. आमदार समाधान आवताडे यांचीही मतदारसंघातील कामांची लगबग सुरु होती. आमदार देवेंद्र कोठे यांनीही दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटचा दौरा केला होता.

दरम्यान, नागपूर इथं आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातसोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार का आणि जिल्ह्याला यंदा तरी भूमिपुत्र पालकमंत्री मिळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार