शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:47 IST

व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

ठळक मुद्देटेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळावामाजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावेभाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि २६ : व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. टेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, माढा तालुक्यात एकाच घरात दोन गट असून चित भी आपली व पट पण आपलीच, अशी स्थिती आहे. तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी भाजपचा आमदार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजे. भाजपचा उद्देश केवळ सत्ता भोगणे नसून सत्तेचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देणे हा आहे. पूर्वी जिल्ह्यात सात ते आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या, परंतु सामान्य माणसाला काय मिळाले? सत्तेचा वापर स्वत:च्या कुटुंबासाठी केला, जनतेसाठी नाही. बँका कर्ज देण्यासाठी सहकार्य करत नसतील, सोसायट्यांचे सदस्य करून घेतले जात नसेल तर तक्रार करा, असा सल्ला देशमुख यांनी दिला.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. केंद्र शासनाने २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याची घोषणा केली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकत २०१९ पर्यंतच बेघरांना हक्काचे घर देण्याचे ठरवले आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. भाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य आहेत, यामागे निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळ आहे, म्हणूनच पक्ष वाढला आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा संघटक राजकुमार पाटील, अनिल पाटील, बबन केचे यांचीही भाषणे झाली. -----------------------संजय शिंदे भाजपच्या दारातसंजय शिंदे हे भाजपाच्या दारात उभे असून त्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. मी बाजार समितीचा थकबाकीदार आहे का नाही, याची प्रथम चौकशी करावी. गाळ्यांमध्ये मिंधे नाही. मग गाळ्यांचा नफा कोणी खाल्ला? बैठकीला न जाता उपस्थित भत्ता कोणी घेतला, हे सांगावे. मी जिथे जाईल तिथे चांगले दिवस आले आहेत. २५ वर्षांत राजकीय व आर्थिकदृष्ट्या कार्यकर्ते उभे केल्याचे उदाहरण दाखवावे. माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावे.  शिंदे घराण्याने आत्तापर्यंत सर्वांना फसविण्याचे काम केले आहे, असा कोकाटे यांनी आरोप केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा