शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:47 IST

व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

ठळक मुद्देटेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळावामाजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावेभाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि २६ : व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. टेंभुर्णी येथील ओम साईराज मंगल कार्यालयात माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, माढा तालुक्यात एकाच घरात दोन गट असून चित भी आपली व पट पण आपलीच, अशी स्थिती आहे. तालुक्यात परिवर्तन करण्यासाठी भाजपचा आमदार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजे. भाजपचा उद्देश केवळ सत्ता भोगणे नसून सत्तेचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देणे हा आहे. पूर्वी जिल्ह्यात सात ते आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या, परंतु सामान्य माणसाला काय मिळाले? सत्तेचा वापर स्वत:च्या कुटुंबासाठी केला, जनतेसाठी नाही. बँका कर्ज देण्यासाठी सहकार्य करत नसतील, सोसायट्यांचे सदस्य करून घेतले जात नसेल तर तक्रार करा, असा सल्ला देशमुख यांनी दिला.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. केंद्र शासनाने २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याची घोषणा केली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकत २०१९ पर्यंतच बेघरांना हक्काचे घर देण्याचे ठरवले आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. भाजपचा आता वटवृक्ष झाला असून दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या पक्षाकडे आज ११ कोटी सदस्य आहेत, यामागे निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळ आहे, म्हणूनच पक्ष वाढला आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा संघटक राजकुमार पाटील, अनिल पाटील, बबन केचे यांचीही भाषणे झाली. -----------------------संजय शिंदे भाजपच्या दारातसंजय शिंदे हे भाजपाच्या दारात उभे असून त्याबाबत पक्षाने निर्णय घ्यावा. मी बाजार समितीचा थकबाकीदार आहे का नाही, याची प्रथम चौकशी करावी. गाळ्यांमध्ये मिंधे नाही. मग गाळ्यांचा नफा कोणी खाल्ला? बैठकीला न जाता उपस्थित भत्ता कोणी घेतला, हे सांगावे. मी जिथे जाईल तिथे चांगले दिवस आले आहेत. २५ वर्षांत राजकीय व आर्थिकदृष्ट्या कार्यकर्ते उभे केल्याचे उदाहरण दाखवावे. माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, सुभाष गुळवे असे अनेक कार्यकर्ते का गेले सोडून, याचे आत्मपरीक्षण करावे.  शिंदे घराण्याने आत्तापर्यंत सर्वांना फसविण्याचे काम केले आहे, असा कोकाटे यांनी आरोप केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा