शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

सन्मान योजनेच्या लाभासाठी सोलापूर जिल्ह्यातील बारा लाख शेतकºयांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:59 IST

सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ शेतकºयांना देण्यात येत आहे.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ ...

ठळक मुद्देनिधी देण्यासाठी समारंभ : लाभार्थी शेतकºयांचा सन्मान होणारबँक तपशील प्राप्त नसल्याने शेतकºयांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात अडचणमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठोस काम दिसण्याची शक्यता

सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ शेतकºयांना देण्यात येत आहे.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ३३ हजार शेतकºयांची नावे आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथून शेतकºयांना या सन्मान निधीचे वितरण स्वत: करणार आहेत. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात शेतकºयांना या योजनेतून दोन हजार रुपयांचा मदत निधी त्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गतीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९९ हजार शेतकरी कुटुंबांना या योजनेसाठी प्राथमिक स्तरावर पात्र ठरविण्यात आले आहे. यापैकी २ लाख १७ हजार शेतकºयांची संपूर्ण माहिती बँक खात्यासह आॅनलाईनवर नोंदविण्यात आली आहे. उर्वरित शेतकºयांची यादी व बँक तपशीलही आठ दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे. 

पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान दोन हजार रुपयांचा सन्मान निधी देण्याचा शुभारंभ रविवारी होत आहे. गोरखपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात लाईव्ह करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील होणारा शेतकºयांचा सन्मानही लाईव्ह करण्यात येत आहे. 

निधी जमा करण्यात अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्नही सुरू केले आहेत; मात्र अजूनही बहुतांश शेतकºयांचा बँक तपशील प्राप्त नसल्याने शेतकºयांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठोस काम दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचNarendra Modiनरेंद्र मोदी