शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

काय सांगता; घरासाठी सर्वाधिक अत्यावश्यक वीजच; पण बिलांचा भरणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 16:24 IST

पश्चिम महाराष्ट्रात 27 लाख घरगुती वीजग्राहकांकडे 863 कोटींची थकबाकी

सोलापूर : वीज ही अत्यावश्यक असताना घरगुती खर्चात मात्र वीजबिलांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची स्थिती असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर थकबाकीदार ग्राहकांच्या तुलनेत सर्वाधिक 27 लाख 44 हजार घरगुती ग्राहकांकडे 863 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांनी मूलभूत गरज बनलेल्या विजेसाठी थकीत व चालू बिलांचा भरणा करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून थकबाकी वसुल करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 3) व रविवारी (दि. 4) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 31 लाख 37 हजार 389 ग्राहकांकडे 1290 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक 87.46 टक्के थकबाकीदार ग्राहक हे घरगुती वीजवापर करणारे आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी तसेच ऑनलाईन शिक्षण व कार्यालयीन कामांसह इतर घरगुती कामांसाठी विजेची नितांत आवश्यकता आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या एकूण घरगुती 58 लाख 28 हजारांपैकी तब्बल 27 लाख 44 हजार (47 टक्के) घरगुती ग्राहकांनी वीजबिल थकविलेले आहे.

वाणिज्यिक व औद्योगिक तुलनेत प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी 300 युनिटपर्यंत प्रतियुनिट वीजदर सवलतीचे आहेत. घरातील किमान दोन ते तीन संख्येत असलेल्या मोबाईल सेवेचे तसेच डिश टिव्ही किंवा स्वतंत्र इंटरनेट कनेक्शनचे रिचार्ज वेळेत केले नाही तर त्याच दिवशी तात्काळ सेवा खंडित केली जाते. याउलट वीज ही अत्यावश्यक असूनही त्याचे बिल वेळेत भरले जात नाही अशी स्थिती आहे. घरगुती वीजवापरासाठी सवलतीचे वीजदर आहेत. तरीही अनेक महिन्यांचे वीजबिल थकीत राहते. त्यामुळे महावितरणला नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागते. महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने नफा कमाविणे हे ध्येय निश्चितच नाही. पण कोणत्याही प्रकारचे अनुदान नसल्याने महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च हा वीजबिल वसुलीवरच अवलंबून असतो. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत जिल्हानिहाय एकूण घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे जिल्हा- 12 लाख 20 हजार 350 (39.46 टक्के) ग्राहकांकडे 439 कोटी 67 लाख, सातारा- 3 लाख 39 हजार 355 (51.57 टक्के) ग्राहकांकडे 55 कोटी 33 लाख, सोलापूर- 4 लाख 480 (65.38 टक्के) ग्राहकांकडे 140 कोटी 98 लाख, सांगली- 3 लाख 19 हजार 143 (54.18 टक्के) ग्राहकांकडे 91 कोटी आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 701 (53 टक्के) घरगुती ग्राहकांकडे 136 कोटी 48 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPuneपुणेSangliसांगलीBaramatiबारामती