शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

आधुनिक पीकपद्धतीने ६० गुंठ्यात घेतला नऊ लाखांचा कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 11:02 IST

शेतकरी रणजित उबाळेंचा प्रयोग; होणार होते भारतीय सैनिक... झाले प्रगतिशील बागायतदार

ठळक मुद्दे९ लाख ५० हजारांच्या कांद्याचे उत्पन्न तीन महिन्यात घेण्याची किमयाआॅगस्टमध्ये ६० गुंठ्यात पंचगंगा या वाणाच्या रोपाची लागवड केली़पावसामुळे केवळ ४ ते ५ वेळाच  पाणी दिले़ पिकातून तीनवेळा खुरपणी केली

हणमंत पवार 

नरखेड : नरखेड येथील अनेक तरुण सैन्यात भरती झालेले...स्वत:ला सैन्यात जाण्याची  इच्छा...अनेक प्रयत्न केले...यश गवसत नव्हते...आता मार्गच बदलण्याचा निर्णय घेतला... निराश न होता आधुनिक पद्धतीने शेती केली.. ६० गुंठ्यात  ३०० पिशव्या अर्थात १५ टन माल घेतला. ९ लाख ५० हजारांच्या कांद्याचे उत्पन्न तीन महिन्यात घेण्याची किमया मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका तरुणाने साधली आहे.

मोहोळ तालुक्यातील  नरखेड येथील रणजित बिभीषण उबाळे असे त्या तरुणाचे नाव़ १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन सैन्यात भरती  होण्यासाठी दोन वर्षे प्रयत्न केले. सोबतीचे सवंगडी सैन्यात भरती झाले. स्वत:च्या प्रयत्नांना यश येत नसल्याने भरतीचा नाद सोडून पुणे येथील कुरकुंभ एम.आय.डी़सी. कंपनी गाठली.  तेथील पगार व खर्च परवडत नसल्याने त्यांनी गाव गाठले़ आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला़ आता शेती करायची तर पारंपरिक नव्हे तर आधुनिक पद्धतीने, नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. 

आॅगस्टमध्ये ६० गुंठ्यात पंचगंगा या वाणाच्या रोपाची लागवड केली़ त्यात मशागत केली. रोपांची लागवड केल्यानंतर ७ ते ८ दिवसानंतर पाणी देऊन कॅबरेटाप, कर्जेट, नेटिओ, नुआन, पाँकल्याण या औषधांचे डोस दिले. पावसामुळे केवळ ४ ते ५ वेळाच  पाणी दिले़ पिकातून तीनवेळा खुरपणी केली़ डिसेंबरमध्ये विक्रीसाठी कांदा उपलब्ध झाला़ आवक कमी असल्याने प्रतिक्विंटल १० हजार ते १४ हजार रुपये दर मिळाला़ ६० गुंठ्यामध्ये  ९ लाख ५० हजारांचे विक्रमी उत्पादन मिळाले़ यासाठी ६० हजार रुपयांचा खर्च आला. 

३० गुंठ्यात उभारले शेततळे - उन्हाळ्यात पाणी टंचाई  भेडसावत होती़ पिके  कशी जगवायची असा प्रश्न होता़ अनेक अडचणींवर मात करुन ३० गुंठ्यामध्ये शेततळे उभारले़ हे पीक घेत असताना संघवी अ‍ॅग्रोचे गणेश इनामदार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे उबाळेंनी सांगितले. नव्या कल्पना, प्रयोगांना प्रयत्नांची जोड दिली आणि आज  ९ लाखांचे उत्पन्न मिळाले़ 

देशात हरितक्रांती होऊन आपण पीकपद्धत  बदललेली नाही़ पारंपरिक पद्धतीने पीक घेत असल्याने फारसे उत्पन्न मिळत नाही़ आता पीक पद्धत घेण्याची पद्धतच बदलली आहे़ आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळालो आणि सैन्यात जाण्याचा जो आनंद होता तो पीक लागवडीतून घेतोय़ आधुनिकता स्वीकारली की जीवनातील नैराश्यही दूर होते याचा अनुभव घेतोय़ - रणजित उबाळे कांदा उत्पादक, नरखेड   

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा