शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

दूध पंढरीचा औरंगाबाद, पुण्यात ‘पॅकिंग दूध प्रकल्प’ ’ सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:35 IST

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे

ठळक मुद्देसोलापूरसह राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेदूध संघाने केगाव येथील प्रकल्पातून दही तयार करण्यास सुरूवात केलीपहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे हे प्रकल्प १५ दिवसात सुरू करण्याची तयारी केली आहे

सोलापूर : अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर सहकारी दूध संघाने (दूध पंढरी) पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे पॅकिंग दूध विक्री प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पॅकबंद दही प्रकल्प सुरू केला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी दिली.सोलापूरसह राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. जगातील बाजारपेठेत दूध पावडरीचे दर कोसळल्याने राज्यातील पावडर प्रकल्प बंद पडले आहेत. पावडरीसाठी वापरले जाणारे दूध बाजारात विक्रीसाठी आल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत दूध वाढीचा कालावधी असतो त्यातच पावडरीसाठीचे दूध बाजारात आल्याने उदंड झाले दूध अशी स्थिती झाली आहे. 

यामुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने पॅकिंग पिशवीतून दूध विक्री करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद व अमरावती येथे भाडेतत्त्वावर प्लॉन्ट घेऊन तेथून ‘पॅकिंग’पिशवीतून दूध विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे व औरंगाबाद येथे हे प्रकल्प १५ दिवसात सुरू करण्याची तयारी केली आहे. किमान एक एप्रिलपासून या शहरात दूध पंढरीचे दूध पॅकिंग पिशवीतून विक्री सुरू होईल असे व्यवस्थापकीय संचालक मुळे यांनी सांगितले. त्यानंतर हैदराबाद, अमरावती व अन्य ठिकाणीही पॅकिंग पिशवी दूध विक्री प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.  

दूध संघाने केगाव येथील प्रकल्पातून दही तयार करण्यास सुरूवात केली असून सध्या दररोज ५०० ते ७०० लिटर दही  तयार करुन त्याची शहरातच विक्री केली जात असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.हक्काचे मार्केट तयार होईल: परिचारक- वैभववाडी येथे टँकरने दूध नेऊन तेथे पॅकिंग करुन गोव्याला सध्या १० हजार लिटर दूध विक्री केली जात असून कोकणातही पॅकिंग दुधाची विक्री सुरू होणार असल्याचे दूध पंढरीचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. केगावला बाटली बंद दूध प्रकल्पाचे(निर्जंतुक सुगंधी दूध) काम सुरू असून दीड-दोन महिन्यात ते बाजारात विक्रीसाठी येईल. हे दूध  तयार झाल्यापासून किमान चार महिने टिकेल,   हक्काचे मार्केट तयार केले तरच बाजारात टिकाव लागेल असे आ. परिचारक म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAurangabadऔरंगाबादPuneपुणे