शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एप्रिलपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये हस्तलिखित नोंदी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 11:27 IST

पेपरलेस कामाची तयारी सुरू, दप्तर पंचायतींमध्ये आणून सील करण्यासाठी प्रशासन तयारीत

ठळक मुद्दे राज्य शासनाने २४ जानेवारी २०१८ रोजी ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीसंदर्भात आदेश जारी केलाजिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींपैकी ९५५ ग्रामपंचायतींमध्ये या कामाची पूर्वतयारी सुरू

राकेश कदमसोलापूर : केंद्र शासनाच्या ई-पंचायत प्रकल्पांतर्गत एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या १ ते ३३ प्रकारच्या हस्तलिखित नोंदी बंद करण्यात येत आहेत. एप्रिलमध्ये सर्व ग्रामपंचायतींच्या नोंदवह्या सील करून पंचायत समितीमध्ये आणल्या जातील. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम न करणाºया केंद्रचालक आणि ग्रामसेवकाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींपैकी ९५५ ग्रामपंचायतींमध्ये या कामाची पूर्वतयारी सुरू आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी मार्च अखेर काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. 

 राज्य शासनाने २४ जानेवारी २०१८ रोजी ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीसंदर्भात आदेश जारी केला होता. यानुसार ग्रामपंचायतींच्या दैैनंदिन कारभाराशी निगडित १ ते ३३ नोंदवह्यांचे संगणकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. नोंदवह्यातील माहिती ई-ग्रामसॉफ्ट या प्रणालीमध्ये भरायची. त्याची पडताळणी करायची. एकदा ही सर्व माहिती अपलोड झाली की, आपले सरकारचे केंद्रचालक मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्रासह १९ प्रकारचे दाखले प्रिंट काढून द्यायचे, असे या आदेशात नमूद होते. या कामात ग्रामसेवक आणि आपले सरकार केंद्र चालक यांची महत्त्वाची भूमिका आहे. यासाठीची पूर्वतयारी मार्च महिन्यात करणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. याबाबत आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक महावीर काळे म्हणाले, सर्व केंद्रचालक, ग्रामसेवकांना पेपरलेस कामासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात नोंदवह्या सील करून पंचायत समितीमध्ये आणल्या जातील. सर्व नोंदी सॉफ्टवेअरमध्येच अपडेट कराव्या लागतील, न करणाºयांवर कारवाई होईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय